निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा

निलजई–आमडी मार्गाचा रस्ता चार दिवसांत उखडला; निकृष्ट कामावर ग्रामस्थ संतप्त, आंदोलनाचा इशारा बातमी: वरोरा : निलजई, आमडी आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या निकृष्ट रस्त्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रस्ते नूतनीकरण अवघ्या चार दिवसांत उखडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सरकार तर्फे ठेकेदारा मार्फत रोड बांधण्याचे काम सुरू आहे. बांधकाम करण्यात येत असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. डांबराऐवजी वेस्टेज ऑईलचा वापर करून रस्ता तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी या प्रकाराला “बनावट विकास” असे संबोधले आहे. रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे की, तो हातानेही उखडला जात असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. दरम्यान, या रस्त्याची दुर्दशा सोशल मीडियावर व्हायरल होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार आणि प्रशासनामध्ये साटेलोटे असल्याची शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे...

गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोऱ्यात जनजागृती; तहसीलदारांना निवेदन सादर

“गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोऱ्यात जनजागृती; तहसीलदारांना निवेदन सादर
बातमी:28/4/26

वरोरा : “गौमाता सन्मान दिवस” निमित्त वरोरा शहरात विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने गौमाता संरक्षण, सेवा व सन्मान यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांनी एकत्र येत वरोरा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी गौमातेला भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय स्थान असल्याचे सांगत तिचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात राज्य व देशात गौहत्या बंदी अधिक कडक करणे, गोरक्षणासाठी कठोर कायदे व प्रभावी अंमलबजावणी करणे, गौमातेला “राष्ट्रमाता” दर्जा देण्याचा विचार करणे, भटक्या व निराधार गाईंसाठी निवारा व संगोपन केंद्रे वाढवणे तसेच शेतकऱ्यांना गाईंच्या संगोपनासाठी आर्थिक मदत व योजना उपलब्ध करून देणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
या प्रसंगी अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शांततेत व शिस्तीत आपली भूमिका मांडत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या उपक्रमामुळे परिसरात गौमाता संरक्षणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.

Comments