"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी"
वरोरा-
आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे भारतरत्न डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर,प्रमुख वक्ते:- प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख)
प्रा. नीरज आत्राम ( रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकरांच्या महान कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “डॉ.बाबासाहेबांनी केवळ भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही, तर त्यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात करणे अत्यंत आवश्यक आहे.” तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे भान ठेवून प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, आजच्या काळात डॉ.बाबासाहेबांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरत असून, तरुणांनी त्यांचे विचार आत्मसात करून देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रभावी भाषणात डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकर हे केवळ संविधान निर्माता नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी भारताच्या आर्थिक विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक विचार मांडले.”
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करून स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल शेरकी यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन अक्षरा बावणे हिने केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांचे विशेष योगदान लाभले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment