प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

रेती घाटाचे शिल्लक पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकांवर हल्ला. दोन गटात तुडुंब हाणामारीत युवकाचा मृत्यू .घटनास्थळी पोलीस दाखल पोलिसांचा तपास सुरू

रेती घाटाचे शिल्लक पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकांवर हल्ला. 
दोन गटात तुडुंब हाणामारीत युवकाचा मृत्यू .

घटनास्थळी पोलीस दाखल पोलिसांचा तपास सुरू 

. वरोरा (जि. चंद्रपूर), दि. २ मार्च: तालुक्यातील बामर्डा येथील वणा नदीच्या रेती घाटावर पैशांच्या वादातून एका ४० वर्षीय युवकाचा तलवारीने वार करून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास घडकीस आली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी चार महागड्या गाड्यांची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंगणघाट येथील रहिवासी आणि रेती वाहतूक व्यावसायिक अमोल मधुकर ठोंबरे यांनी याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भरत दयानंद नागपाल (रा. पुलगाव, ता. वरोरा) असे मृत वाळू व्यवसाईकाचे नाव आहे.

फिर्यादीनुसार, ठोंबरे आणि त्यांचे साथीदार यांनी गितेश सातपुते यांच्याकडून बामर्डा येथील वणा नदीचा रेती घाट सुमारे २ कोटी ५ लाख रुपयांना खरेदी केला होता. मात्र, सातपुते यांनी जानेवारीमध्ये घाट परत घेतला आणि उर्वरित ९८.६४ लाख रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत परत करण्याचे आश्वासन दिले. पैसे न मिळाल्याने ठोंबरे व इतर भागीदार रविवारी सायंकाळी७.०० वाजताच्या सुमारास मालकाकडे पैशांची मागणी करण्यासाठी बामर्डा घाटात गेले होते.

घाटावर पोहोचल्यानंतर गितेश सातपुते यांच्या आदेशाने दिवाणजी आणि पोकलॅन्ड चालकांनी दोन्ही रस्त्यांवर पोकलॅन्ड मशीन आडव्या लावून त्यांच्या गाड्यांना अडवले. काही वेळातच अमोल कामडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकुर यांच्यासह इतर सात-आठ जण तलवारी, लोखंडी दांडे आणि रॉड्स घेऊन तेथे दाखल झाले.

आरोपी सौरभ ठाकुर याने फिर्यादी अमोल ठोंबरे यांच्यावर तलवारीने वार केला. हा वार डोक्याखाली लागल्याने ते जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या भरत नागपाल यांच्या डोक्यात सौरभने तलवारीने जोरदार वार केला. गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपींनी भरत नागपाल यांना नदीच्या खोल पात्रात फेकून दिले. जिवाच्या भीतीने अन्य साथीदार पळून गेल्याने भरत यांना वाचविणे शक्य झाले नाही.

आरोपींनी यानंतर चारही गाड्यांची तोडफोड करून त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना येण्याची माहिती मिळताच ते फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक पोहणाऱ्याच्या मदतीने भरत नागपाल यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वरोरा पोलिसांनी अमोल कामडी, अक्षय खडसे, सौरभ ठाकुर, सुनील झोरे, प्रफुल उमाटे, अतुल मोटघरे यांच्यासह पोकलॅन्ड चालक आणि दिवाणजी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
....................

Comments