प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावटघरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावट
घरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

वरोरा-प्रतिनिधी १/३/२०२६

वरोरा शहरालगत असलेल्या एकार्जुना या गावात गेल्या काही दिवसांपासून भानामतीसारख्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. २४ फेब्रुवारीपासून गावातील काही घरांच्या बाहेर दररोज तांदूळ, गहू, त्यावर निंबू, गुलाल, बुक्का, कुंकू आणि खोबरं अशा वस्तू ठेवण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा प्रकार विशेषतः सकाळी ११.३० वाजता व सायंकाळी ६ नंतर घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या घटनांमुळे गावात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून, अनेकजण रात्री बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींनी यामागे अंधश्रद्धा आणि भानामतीचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी खोडसाळ प्रवृत्तींचा सहभाग असल्याचं मत मांडलं आहे.
या प्रकरणाची चर्चा गावभर रंगली असून नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत आहेत.गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन या घटनेबाबत पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे . गावात रात्री गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
एकीकडे काही जण याला अंधश्रद्धेचा भाग मानत असले तरी सुशिक्षित वर्ग या घटनेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत आहे. भीती न बाळगता पोलिसांच्या मदतीने सत्य समोर आणणे आवश्यक आहे, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
सध्या एकार्जुना गावात या रहस्यमय प्रकारामुळे तणावपूर्ण आणि भीतीचं वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
****

Comments