संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावटघरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावट
घरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

वरोरा-प्रतिनिधी १/३/२०२६

वरोरा शहरालगत असलेल्या एकार्जुना या गावात गेल्या काही दिवसांपासून भानामतीसारख्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. २४ फेब्रुवारीपासून गावातील काही घरांच्या बाहेर दररोज तांदूळ, गहू, त्यावर निंबू, गुलाल, बुक्का, कुंकू आणि खोबरं अशा वस्तू ठेवण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा प्रकार विशेषतः सकाळी ११.३० वाजता व सायंकाळी ६ नंतर घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या घटनांमुळे गावात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून, अनेकजण रात्री बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींनी यामागे अंधश्रद्धा आणि भानामतीचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी खोडसाळ प्रवृत्तींचा सहभाग असल्याचं मत मांडलं आहे.
या प्रकरणाची चर्चा गावभर रंगली असून नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत आहेत.गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन या घटनेबाबत पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे . गावात रात्री गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
एकीकडे काही जण याला अंधश्रद्धेचा भाग मानत असले तरी सुशिक्षित वर्ग या घटनेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत आहे. भीती न बाळगता पोलिसांच्या मदतीने सत्य समोर आणणे आवश्यक आहे, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
सध्या एकार्जुना गावात या रहस्यमय प्रकारामुळे तणावपूर्ण आणि भीतीचं वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
****

Comments