प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

: जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा

: जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट! पुढील तीन तासात हवामान खात्याचा इशारा

तातडीची बातमी:
राज्याचे हवामान खाते (मंत्रालय, मुंबई) यांनी जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. पुढील तीन तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची गडगडाटी वादळे येण्याची शक्यता आहे.

ही वादळे पृष्ठभागावरील वाऱ्यांसह (३० ते ४० किमी प्रति तास या वेगाने) येतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी किंवा विजेच्या खांबांखाली उभे राहू नये, असा सल्ला प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

Comments