प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भावपूर्ण कार्यक्रम संपन्नआमची शाळा कधी चांगली करणार चिमुकल्यांचा सवाल ?

माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भावपूर्ण कार्यक्रम संपन्न

आमची शाळा कधी चांगली करणार चिमुकल्यांचा सवाल ?

वरोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा, वरोरा येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात, भक्तीभावाने व प्रेरणादायी रूपात साजरी करण्यात आली.

सर्वांनी एकत्रितपणे या मंगल प्रसंगी माता रमाबाई यांच्या पावन स्मृतिप्रती विनम्र अभिवादन समर्पित केले. कार्यक्रमात माता रमाबाईंचे जीवन हे त्याग, सहनशीलता व अबाधित समर्पण यांचा प्रेरक इतिहास असल्याचे उल्लेख करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याच्या वाटेवर सतत साथ देणाऱ्या, स्वतःच्या कष्टांवर मात करून समाजाला प्रकाशमार्ग दाखवणाऱ्या माता रमाबाईंच्या अमूल्य योगदानावर भाष्य करण्यात आले. त्या देत असलेली संघर्षाची प्रेरणा आजही तितकीच प्रासंगिक आहे, असे सांगण्यात आले. नगरपालिकेचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमात वरोरा नगर परिषदेचे सिद्धार्थजी मेश्राम, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने माता रमाबाई यांच्या आदर्श जीवनाचे स्मरण व समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य झाले.
                       उपस्थित विद्यार्थी.

या शाळेकडे लक्ष देण्याची गरज
नगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानिमित्ताने नगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी शाळेची स्थिती जाणून घेतली असेल. नगरपालिके मार्फत चालवण्यात येणारी ही शाळा अत्यंत बिकट इमारतीमध्ये उभी आहे आणि या ठिकाणची विद्यार्थी संख्या लक्षात घेता या शाळेची स्थिती लक्षात येते. विद्यार्थ्यांना  एक बिस्कीट पुडा मिळाल्याने मुलेही खूप खुश झाली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना काहीतरी मिळाले याचा आनंद आहे. इमारतीला रंगो रंगोटी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा व्यवस्थित लिहायला वेळ मिळत नसेल तर शोकांतिका आहे. हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नगरपालिका फक्त फोटो पुरते काम करते काय असा सवाल उभा राहिला आहे. 

बऱ्याच दिवसापासून शाळेमध्ये पिण्याचे शुद्ध पाण्याची सोय, अद्यावत डिजिटल फळा, शाळेमध्ये फॅन, बसण्यासाठी खुर्ची, अभ्यास करण्यासाठी पेपर व पुस्तके, संगणक, शाळेची रंगरगोटी, स्वच्छतागृह, पोषण आहाराची व्यवस्था अशा अनेक बाबीची कमतरता असल्याने नगरसेवकांनी लक्ष द्यावे ही मागणी तेथील पालकाकडून करण्यात आली आहे.
....................
*नगरसेवक राज खंडारे* 
या शाळेचे पुनरुत्थान करण्यासाठी हा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला आहे.  येत्या पाच वर्षात ही शाळा इतर शाळेसाठी मॉडेल बनेल अशी बनवून दाखवू.
..........
माजी नगरसेवक पंकज नाशिककर
इ लायब्ररीवर खर्च करण्यापेक्षा प्राथमिक शिक्षण यावर खर्च झाला पाहिजे. अंगणवाड्या ,प्राथमिक शाळा, सुरू करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु प्रशासनाची उदासीनता दिसून आली.
.............

Comments