वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

वरोरा : शहरात भटक्या कुत्र्यांचा संचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी नागरिकांशी सोशल मीडिया मार्फत संवाद साधत मोठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर अमर्याद प्रमाणात वाढला असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली. यावर वरोरा शहरातील नागरिकांनी सोशल मीडिया कॉमेंट्स वर अनेक समस्या त्यांच्यापुढे मांडलेले आहेत.

नगराध्यक्ष ठाकरे म्हणाल्या, "भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. नगर परिषद प्रशासन यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहेच, परंतु नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात हिंस्त्र किंवा संशयास्पद भटके कुत्रे आढळल्यास कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ नगर परिषद प्रशासनाला कळवावे." 

त्यांनी विशेषतः लहान मुलांच्या पालकांना आवाहन केले की, मुलांना रस्त्यावर एकटे सोडू नये आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावे. ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळ-संध्याकाळच्या वेळेत सतर्कता बाळगावी, असे सांगितले. नगराध्यक्ष यांनी शेवटी विश्वास दिला की, नागरिकांची सुरक्षा हीच प्रशासनाची प्राथमिकता आहे. "सतर्क राहा, सुरक्षित राहा," असे आवाहन त्यांनी केले.

Comments