प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका; नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

वरोरा : शहरात भटक्या कुत्र्यांचा संचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी नागरिकांशी सोशल मीडिया मार्फत संवाद साधत मोठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरोरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर अमर्याद प्रमाणात वाढला असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली. यावर वरोरा शहरातील नागरिकांनी सोशल मीडिया कॉमेंट्स वर अनेक समस्या त्यांच्यापुढे मांडलेले आहेत.

नगराध्यक्ष ठाकरे म्हणाल्या, "भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. नगर परिषद प्रशासन यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहेच, परंतु नागरिकांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात हिंस्त्र किंवा संशयास्पद भटके कुत्रे आढळल्यास कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ नगर परिषद प्रशासनाला कळवावे." 

त्यांनी विशेषतः लहान मुलांच्या पालकांना आवाहन केले की, मुलांना रस्त्यावर एकटे सोडू नये आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावे. ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळ-संध्याकाळच्या वेळेत सतर्कता बाळगावी, असे सांगितले. नगराध्यक्ष यांनी शेवटी विश्वास दिला की, नागरिकांची सुरक्षा हीच प्रशासनाची प्राथमिकता आहे. "सतर्क राहा, सुरक्षित राहा," असे आवाहन त्यांनी केले.

Comments