संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

बेलोरा/अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची जिल्हाप्रमुख - प्रहार शेतकरी संघटना (चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे नियुक्तीपत्र वितरीत केले. भारतीय संविधानातील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्यामुळे डुकरे यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कृषी कर्ज व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळवून देणे, ही प्रमुख कार्ये असतील. मात्र, ही नियुक्ती परिविक्षाधीन कालावधीसाठी असून, या कालावधीत कोणतेही मानधन, भत्ते किंवा आर्थिक सुविधा राहणार नाहीत, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नियुक्ती स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात विविध शाखांचे उद्घाटन वृक्षारोपण व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------

Comments