प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

बेलोरा/अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची जिल्हाप्रमुख - प्रहार शेतकरी संघटना (चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे नियुक्तीपत्र वितरीत केले. भारतीय संविधानातील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्यामुळे डुकरे यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कृषी कर्ज व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळवून देणे, ही प्रमुख कार्ये असतील. मात्र, ही नियुक्ती परिविक्षाधीन कालावधीसाठी असून, या कालावधीत कोणतेही मानधन, भत्ते किंवा आर्थिक सुविधा राहणार नाहीत, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नियुक्ती स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात विविध शाखांचे उद्घाटन वृक्षारोपण व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------

Comments