वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : कोंढाळा ग्रामस्थांवर कंपनीच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपकिशोर डुकरे व प्रवीण गंधारे यांच्यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हे दाखल.

वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : कोंढाळा ग्रामस्थांवर कंपनीच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप


वरोरा, ता. १६ फेब्रुवारी – श्री सिमेंट कंपनीच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून कंपाऊंड भिंतीचे काम बंद पाडल्याप्रकरणी कोंढाळा गावातील सुमारे 30 ते 35 जणांच्या विरोधात वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी श्री सिमेंट कंपनीचे कॉर्पोरेट अफेअर हेड आशीष अनील कुलकर्णी (वय ४३, रा. वडगाव, चंद्रपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
...................
फिर्यादीनुसार, दिनांक १६/०२/२०२६ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास किशोर डुकरे (रा. आसाळा) यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कंपनीच्या मौजा कोंढाळा व निमसळा येथील जागेत अतिक्रमण केले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीचे वॉल कंपाऊंडचे काम करणाऱ्या मजुरांना धमकावून काम थांबविले.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीगणांनी कंपनीचा ट्रक व जेसीबी अडवून काम बंद पाडले तसेच कामगारांना ‘जिवे मारून टाकण्याची’ धमकी दिली. या प्रकरणी प्रवीण गंधारे याने आरोपींना चिथावणी दिल्याचाही उल्लेख आहे.

फिर्यादीत हर्षद आवारी, संजय खिरटकर, ईश्वर देवतळे, प्रविण देवतळे, प्रभाकर गौरकर, प्रमीला गौरकार, धर्मेद्र ढेंगळे, समीर देवतळे, रमेश चिकटे, गोपाल पारखी, मंगेश चिकटे, इंद्रजीत देवतळे, विजय चिकटे, राजू विरूरकर, जगदीश पारखी, विपुल किन्नाके, अमोल देवतळे, विजय देवतळे, राकेश पारखी, चाखन गौरकर, पांडुरंग देवतळे, सुरेखा लभाणे, सुर्यभान शेरकुरे, बंडू पारखी, सविता देवतळे, कल्पना पायघन, शारदा बेलेकर, बेबी लालसरे, अनीता पारखी, ज्योती शिरसागर, लक्ष्मण सरपाते यांच्यासह इतर ३५ ते ५० जणांवर आरोप करण्यात आले आहे.

पोलिसांनी हे  प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले आहे. प्रकरण क्रमांक – ४५/२०२६ नुसार भा.न्या.सं. ३०९(४), ३५१(२), ३५२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यारी मनीष जगन्नाथ तालेवार
पोलीस उपनिरीक्षक वरोरा यांचा तपास सुरू आहे.

किशोर डुकरे 
पोलिसांनी जे गुन्हे दाखल केलेले आहे ते चुकीचे आहे. आम्ही गावकऱ्यांच्या हितासाठी तिथे आंदोलन करत होतो. गावातील जमीन कंपनीकडे जात असल्याने गावाचे पुनर्वसन करावे. बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा. आणि गावातील उर्वरित जमीन कंपनीने विकत घ्यावी. अशा काही मुद्द्यांवरती या ठिकाणी आंदोलन सुरू होते. 
.......................

Comments