प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*महापुरुष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे:आलोक जाधव* वरोडा :

*महापुरुष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे:आलोक जाधव*
 वरोडा : शाम ठेंगडी 

स्वधर्माच्या रक्षणार्थ शिवराय व शंभुराजे यासारख्या ज्या महापुरुषांनी आपले बलिदान दिले. त्या महापुरुषांना डोक्यावर नाचविण्यापेक्षा त्यांना डोक्यात जपले पाहिजे. यामुळे स्वधर्माचे रक्षण होईल. स्वधर्म टिकला तरच आपले अस्तित्व राहील.महापुरूष केवळ कार्यक्रमापुरतेच नसावे तर त्यांचे स्मरण रोज करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्यामुळेच आज आपण आहोत असे विचार वरोडा मराठा समाजाचे सचिव आलोक जाधव यांनी काढले.
      येथील स्वामीनाथा विद्यालयामध्ये 18 फरवरी रोज बुधवारला आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी सरबती बागला कॉन्व्हेंटच्या माजी मुख्याध्यापिका विद्या देव-ठेंगडी व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा चतुरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
       यावेळी विद्या देव-ठेंगडी यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग सांगून आपण सर्वांनी धर्माच्या रक्षणार्थ त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
      यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवबाचा पाळणा हे आकर्षक नृत्य सादर केले.
      मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांची  प्रतिमा व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीमा करडक यांनी कार्यक्रमाचे संचालन व उपस्थित त्यांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Comments