प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

हेडिंग: मासिक १० टक्के व्याजाचे आमिष, ५२ जणांना १.५९ कोटींचा फसवणूक; गुजरातमधील आरोपीवर वरोरात गुन्हा

मासिक १० टक्के व्याजाचे आमिष, ५२ जणांना १.५९ कोटींचा फसवणूक; गुजरातमधील आरोपीवर वरोरात गुन्हा

वरोरा (चंद्रपूर) : दरमहा तब्बल १० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ नागरिकांकडून १ कोटी ५९ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातमधील वलसाड येथील राजूभाई दयाभाई देसाई (वय ६०) याच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देसाई हा २०२४ मध्ये वरोऱ्यात आला होता. त्याने 'एन.आर. एंटरप्राइजेस' नावाची कंपनी असल्याचे सांगत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. १९ ऑगस्ट २०२४ पासून अनेकांनी टप्प्याटप्प्याने त्याच्याकडे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. सुरुवातीचे सुमारे अकरा महिने व्याजाची रक्कम वेळेवर मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि अधिकाधिक नागरिकांनी पैसे गुंतविले. मात्र, जुलै २०२५ नंतर मात्र व्याज देणे अचानक बंद झाले.

गुंतवणूकदारांनी जेव्हा वारंवार संपर्क साधला तेव्हा देसाईने बँक खात्यात तांत्रिक अडचण असून दोन-तीन महिन्यांत सर्व रक्कम मिळेल, अशी उत्तरे देण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात मात्र कोणतीही रक्कम गुंतवणूकदारांना परत मिळाली नाही.

फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर काही गुंतवणूकदार थेट गुजरातमधील वलसाड येथे पोहोचले आणि देसाईला घेऊन वरोरा येथे परतले. वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात सर्व गुंतवणूकदार जमले असताना देसाईने काहींना धनादेश दिले; मात्र ते वटले नाहीत. नंतर त्याने स्टॅम्प पेपरवर ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम परत करण्याचे किंवा स्वतःची जमीन विकून पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले. ठरलेल्या मुदतीतही रक्कम न मिळाल्याने अखेर १४ फेब्रुवारीला शरद वाल्मीक मांदाळे (रा. वरोरा) यांनी ५२ गुंतवणूकदारांच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, गुंतवणूकदारांनी देसाईला वरोऱ्यात आणले तेव्हाच त्याच्या पत्नीने गुजरातमधील वलसाड पोलिस ठाण्यात पतीच्या अपहरणाची तक्रार दिल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
......................

Comments