प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

बोर्डा गावात विकासकामांचा शुभारंभ; आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सीसी रस्ता व नाल्याचे उद्घाटन

 बोर्डा गावात विकासकामांचा शुभारंभ; आमदार करण देवतळे यांच्या हस्ते सीसी रस्ता व नाल्याचे उद्घाटन

बोर्डा (वरोरा तालुका) : येथील मातोश्री वॉर्डात विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार करण देवतळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन केले.

आमदार देवतळे यांनी प्रथम श्री अशोक जयस्वाल यांच्या घरापासून ते श्री सुनिल भोयर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट (सीसी) रस्ता बांधकामाचे उद्घाटन केले. तसेच श्री अमोल देठे यांच्या घरापासून ते श्री धात्रक यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाच्या कामाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे या भागातील नागरिकांची पायाभूत सुविधांसंदर्भातील मागणी पूर्ण झाली आहे.
या कार्यक्रमाला सरपंच राहुल ठेंगणे, डॉ. विजय देवतळे, सुनिल भोयर, कन्हैयालाल जयस्वाल, शंभूनाथ वरघाने, ओमजी मांडवकर, विजय मोकाशी, विठ्ठल लेडे, मोरे सर, वंदना दाते, अनिता देशेट्टीवर, अमृता सुर, किशन सुर, देविदास महाकाळकर, मधुसुधन टिपले, यशवंत सहारे यांच्यासह बोर्डा गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधा मजबूत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून विविध स्थानिक प्रश्न व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी नागरिकांनी आपल्या परिसरातील इतर समस्यांबाबतही आमदारांचे लक्ष वेधले. या चर्चेदरम्यान भविष्यातील विकासकामांबाबत आश्वस्त करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या विकासकामांमुळे मातोश्री वॉर्डातील नागरिकांची दळणवळणाची सोय सुलक्ष होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या चिखल-पाण्याच्या समस्येपासून कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आमदार करण देवतळे यांचे आभार मानले.

Comments