प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

*"ग्रामस्थांवर सूडबुद्धीने केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन"*

 *खासदार प्रतिभा धानोरकर यांचा 'श्री सिमेंट' प्रशासनाला इशारा*

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि 'श्री सिमेंट' कंपनीच्या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यासाठी आज वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. "लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च असतो आणि प्रशासनाने त्याचा अवमान केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही," अशा कडक शब्दांत खासदार प्रतिभा  धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

या बैठकीत कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. "कंपनीने बाहेरील कंत्राटी कामगारांऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे अनिवार्य आहे," असा खंबीर पवित्रा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या सूचना दिल्या. जमिनी देऊनही रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या निष्पाप ग्रामस्थांवर कंपनी प्रशासनाने सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून बाधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप मस्के, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............

    राज्यस्तरीय अधिवेशनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित श्याम ठेंगडी सर. 
.......

Comments