प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

गावकऱ्यावरील लावलेले गुन्हे वापस घेण्याची मागणी.

वरोरा : कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या श्री सिमेंट कंपनीसंदर्भातील विविध मागण्यांबाबत आज उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या आणि कंपनी प्रशासन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, ग्रामपंचायतीच्या नियमांना बगल देऊन कंपनीला देण्यात आलेली ५० वर्षांची एनओसी तातडीने रद्द करावी आणि ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर केला जावा. तसेच, कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली. याशिवाय, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ८ ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून ते त्वरित मागे घेण्यासाठी कंपनी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची आग्रही मागणी केली.

खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, "या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी." या बैठकीतील निर्णयामुळे कोंढाळा-येन्सा परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून आपल्या मागण्यांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments