प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता* *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*

*आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता*

 *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*
 वरोडा : शाम ठेंगडी 
   यंदा तालुक्यातील आंबा झाडाला समाधानकारक बहर आल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण  व रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक मोठ्या संकटात सापडले होते.
    मात्र यावर्षी थंडीचा कडाका, कोरडे वातावरण आणि पोषक हवामान यामुळे बहुतांश आंबा झाडांना एकसारखा व दाट मोहोर फुललेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
     सूर्यप्रकाश कमी होणे, हवेत आर्द्रता वाढणे आणि तापमानात होणारा चढ उतार यामुळे मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास मोहोर गळण्याची भीती असून त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. या ढगाळ हवामानामुळे तुडतुडे, मुरी, करपा यासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 तुडतुडे ही कीड मोहोरातील रस शोषून घेते. त्यामुळे फुले कोमेजून गळून पडतात. मुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोहोर काळवंडतो आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 आंब्याचा मोहोर टिकवण्यासाठी त्यावर औषध फवारणी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते.या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. 
मोहोर या अवस्थेत असताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी, किती प्रमाणात पाणी द्यावे, कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याबाबत सूचना देण्याची मागणी आंबा उत्पादक करीत आहेत.

Comments