कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

सर्वपक्षीय शोकसभा: वरोर्यात अजितदादा पवार यांच्या स्मरणात श्रद्धांजली कार्यक्रम

सर्वपक्षीय शोकसभा: वरोर्यात अजितदादा पवार यांच्या स्मरणात श्रद्धांजली कार्यक्रम

वरोरा चेतन लूतडे १/२/२०२६

वरोरा: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ वरोरा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एक सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोकमय आणि शांत वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या भेदावाचून सर्व पदाधिकारी आणि नागरिक एकत्रित झाले.
कार्यक्रमात खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विलास नेरकर यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली समारंभ पार पडला. राज्याच्या विकासासाठी आणि कृषकहितासाठी केलेल्या अमूल्य योगदानासाठी सर्वांनी माजी उपमुख्यमंत्र्यांना मनापासून आदरांजली वाहिल्या.

कार्यक्रमाच्या दरम्यान, अजितदादा पवार यांनी सर्व राजकीय पक्षांमध्ये जोपासलेल्या सौहार्दाचा आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर केलेल्या निर्णायक लढ्याचा उल्लेख करून सर्व नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमात उपस्थित सर्वजण एकमताने म्हणाले की, त्यांच्या मार्गदर्शनाची आणि राजकीय वारसाची कमी नेहमीच जाणवत राहील.

या शोकपूर्ण प्रसंगी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहण्याच्या सर्वपक्षीय संस्कृतीचे हे प्रदर्शन नागरिकांनीही सहानुभूतीने पाहिले. शेवटी, अजितदादा पवार यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी मौन पाळण्यात आले.

Comments