प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता, पूल नाही म्हणून वंचित!कारेगाव-पारोधी रोड बांधकामाचा फायदा नाही, नालेपलीकडे शेतकरी अडले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता, पूल नाही म्हणून वंचित!
कारेगाव-पारोधी रोड बांधकामाचा फायदा नाही, नालेपलीकडे शेतकरी अडले

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा-भद्रावती-मानोरा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (CMGSY) अंतर्गत कारेगाव ते पारोधी येथील चार किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आलेला असून त्यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, याच रस्त्यावरील एक नाल्यावरचा पूल अजून बांधला गेला नसल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना आजही जाण्यायेण्यासाठी मोठी अडचण सोसावी लागत आहे. पूल नसल्यामुळे हा रस्ता व्यवहार्य ठरलेला नाही आणि शासनाच्या या योजनेचा उद्देशच फोल ठरला आहे.

स्थानिक उपसरपंच यांनी या संदर्भात खंत व्यक्त करत म्हटले आहे, “शासनाने मोठा रस्ता बांधला, पण पूल नाही, तर या रस्त्याचे काय उपयोग? गावकरी सिंचनासाठी, बाजारासाठी, दळणवळणासाठी अडकून पडले आहेत. या रस्त्याचा पूल हा गावाला जीवनरेषेप्रमाणे आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.”

या भागातील शेतकरी म्हणतात, “पावसाळ्यात नाला भरला की परिसर पूर्णपणे तुटतो. रस्ता असूनही आम्ही जुनीच वाट वापरावी लागते. सरकारी योजनेचा हा मोठा विसंगतीपूर्ण प्रकार आहे.”

या व्यतिरिक्त, गावात अनेक मूलभूत सोयी जसे की सिंचन व्यवस्था, पाण्याची टाकी, इतर जोडरस्ते इत्यादी कामे अजूनही अपूर्ण आहेत, ज्यामुळे गावकरी विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. अनेक वर्षांपासून हे प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे मांडले जात असले, तरी कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी याकडे गंभीर लक्ष दिलेले नाही.

स्थानिक नागरिक आता मागणी करीत आहेत की, या रस्त्यासोबत पूल बांधण्याचे काम तातडीने सुरू करावे आणि गावातील इतर मूलभूत समस्याही लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात. त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयाकडेही लक्ष वेधण्याचा आग्रह धरला आहे.

उपसरपंच -मानोरा-

Comments