प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईची मागणीअर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत ७-८ महिने प्रोसिडिंग बुक न भरल्यामुळे सभेत गोंधळ; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईची मागणी
अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत ७-८ महिने प्रोसिडिंग बुक न भरल्यामुळे सभेत गोंधळ; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी


वरोरा, ता. २७ जानेवारी २०२६ – वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत आयोजित मासिक सभेदरम्यान ग्रामसेवकाने गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रोसिडिंग बुक भरले नसल्याचे उघडकीस आल्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. ग्रामसेवकाविरुद्ध लगेच कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पेंदाम यांनी व गावकऱ्यांनी पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य जगदीश पेंदाम यांनी प्रोसिडिंग बुक तपासत असताना लक्षात आले की, जून २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या कोणत्याही कामाचा किंवा रुपयांच्या खर्चाचा तपशील बुकमध्ये नोंदवलेला नाही. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा करता, "मला वेळ नव्हता म्हणून बुक भरले नाही," असे त्यांनी उत्तर दिले.

या प्रतिसादामुळे सभेत उपस्थित गावकरी नाराज झाले व वातावरण तणावग्रस्त बनले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर जगदीश पेंदाम यांनी सभेमध्ये उपस्थित पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी व गावकऱ्यांच्या समक्ष ते प्रोसिडिंग बुक लिफाफ्यात सीलबंद करून वरोरा पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवले.

जगदीश पेंदाम यांनी नमूद केले की, "ग्रामसेवक हे शासनाचे प्रशासकीय अधिकारी आहेत. सात-आठ महिने प्रोसिडिंग बुक न भरणे ही गंभीर गैरवर्तनू आहे. यामागे कोणताही हितसंबंध दडलेला नसेल ना? याबाबत त्वरित चौकशी व्हावी आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी."

गावकऱ्यांसह पेंदाम यांनी पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून ग्रामसेवकाचे तातडीने निलंबन करण्याची मागणी केली आहे. आता गटविकास अधिकारी या तक्रारीवर योग्य कारवाई करतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments