वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

६० लाखांचा डांबरी रस्ता एका वर्षातच उखडला; गावकरी आणि पर्यटक त्रस्त.शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याची भूमिका

६० लाखांचा डांबरी रस्ता एका वर्षातच उखडला; गावकरी आणि पर्यटक त्रस्त.

शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याची भूमिका

शेगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खनिज विकास निधीतून ६० लाख रुपये खर्चून शेगाव-दादापूर-धानोली या डांबरी रस्त्याचे काम गेल्या वर्षी (२०२३-२४) करण्यात आले होते. मात्र, केवळ एका वर्षाच्या आतच या रस्त्याची दुरावस्था झाल्याने गावकरी आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत.

या रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे गावकर्यांनी आरोप केले आहे. रस्ता उखडलेला असल्यामुळे वाहतूक खडतड होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिक दैनंदिन जाणे-येणे करताना मनस्ताप सहन करत आहेत.

गावकरी आणि लोकप्रतिनिधींनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करून, संबंधित करारदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्टदाराला 'काळ्या यादीत' टाकण्याची मागणी केली आहे.

हे रस्ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने, त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनाही खडतड प्रवास करावा लागत आहे.

सध्या, या उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नवीन निधी मागण्यात आला असून, आता दादापूर ते चारगाव हा नवा रस्ता बांधण्याची योजना आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाल्याने, नवीन योजनेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.
एक वर्षाच्या आत रोड जर खराब होत असेल तर रोडचा दर्जा तपासण्याची गरज आहे. संबंधित विभागाकडे पाच वर्षासाठी सेक्युरिटी डिपॉझिट असते. त्यामुळे तो रस्ता नव्याने दुरुस्त करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल तात्काळ घ्यावी अन्यथा शिवसना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी दिला आहे.
********************
***********

Comments