वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

*कोळसा खाण कंपनीच्या मजुरांचे थकीत वेतन व स्थानिक रोजगाराचे प्रश्न चर्चेत; प्रशासनाने हस्तक्षेप केला*

*कोळसा खाण कंपनीच्या मजुरांचे थकीत वेतन व स्थानिक रोजगाराचे प्रश्न चर्चेत; प्रशासनाने हस्तक्षेप केला* 

वरोरा ७ जानेवारी २०२६ - उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या दालनात आज कर्नाटक एमटा कोळसा खाण कंपनीत काम करणाऱ्या सुमारे ६० मजुरांचे थकीत वेतन व स्थानिक नोकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज परिसरात बरीच वर्षे सुरू असलेल्या या खाणकामासंबंधी पुनर्वसन व बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत.

कोळसा उत्खननाचे काम दीर्घकाळ चालू असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाला सभेसाठी बोलावून कामगारांचे वेतन व नोकरीसंबंधित चर्चा यशस्वीपणे पार पाडली. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते तसेच कंपनीत काम करणारे ट्रक ड्रायव्हर व ऑपरेटर्स उपस्थित होते.

बरांज गाव परिसरातील अनेक मागण्या प्रलंबित असून, कंपनीविरुद्ध गावकऱ्यांनी आपल्या समस्या प्रशासनामार्फत सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. तथापि, अद्याप त्यांना काही निराकरण मिळाले नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात बेरोजगार तरुणांनी आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडले. या चर्चेमुळे प्रशासनाने खाण कंपनीकडे दबाव आणला असून, लवकरच काही सोडवणूक होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Comments