महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘आरक्षणाची गरज नाही’ विधानावर आमदार करण देवतळे यांचा कडाडून निषेध.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर;  खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘आरक्षणाची गरज नाही’ विधानावर आमदार करण देवतळे यांचा कडाडून निषेध. वरोरा : १९/४/२६ लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित डिलीमिटेशन घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते सरकारला मिळाली नाहीत. सरकारच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते पडली. विधेयक नामंजूर झाल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी स्पष्ट केले. यानंतर देशभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर–आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेच्या पटलावर केलेले विधान वादात आले आहे. खासदार धानोरकर म्हणाल्या, "महिलांना आरक्षणाची गरज नाही. महिलांना शंभर टक्के आरक्षण असते. पुरुषांच्या जागेवरही महिला लढू शकतात. आम्ही पुरुषांच्या जागेवर लढून संसदेत आलो. आरक्षणाशिवाय इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या. हे बिल खरोखर महिलांना अधिकार देणारे आहे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.           ...

विदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी नागपूर येथे महत्त्वाची बैठक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसराजजी अहिर व बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे हजर

विदर्भातील समस्यांच्या निराकरणासाठी नागपूर येथे महत्त्वाची बैठक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हसराजजी अहिर व बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे हजर

नागपूर, : चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रातील तसेच विदर्भातून आलेल्या नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागपूर येथे आकाशवाणी विश्रामगृहात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजभैया अहिर तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांची उपस्थिती लाभली.
बैठकीत विदर्भ प्रदेशातील ग्रामीण भागातील विकास, शेतीसंबंधित समस्या, पाणीटंचाई, रोजगाराची अनुपलब्धता, तरुणांसाठी कर्जसुविधा, सहकारी बँकेतील अडचणी, शैक्षणिक सुविधा यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. स्थानिक प्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रातील विशिष्ट अडचणी मांडल्या.

मा. हसराजजी अहिर यांनी सर्व समस्यांची नोंद घेतली आणि संबंधित मंत्रालयांमार्फत व केंद्र शासनाच्या योजनांद्वारे त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर, श्री. रविंद्र शिंदे यांनी शेतकरी, लघु उद्योजक तसेच सामान्य नागरिकांना सहकारी बँकेमार्फत सुलभ कर्जव्यवस्था, राबता आणि आर्थिक मार्गदर्शनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकेमुळे विदर्भातील स्थानिक समस्यांकडे केंद्र सरकार व स्थानिक आर्थिक संस्थांचे लक्ष वेधले गेले आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे काम करून प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याची संकल्पना व्यक्त केली. बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.

Comments