कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा - शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या बोजामुळे एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सचिन जगन खेवले (वय २८ वर्षे) यांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक नष्ट झाल्याने निराश होऊन आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

सचिन वरोरा तालुक्यातील जामणी गावाचा रहिवासी होता. कोरोना काळात त्यांचे वडील गेल्याने शेतीची सर्व जबाबदारी सचिनवर आली होती. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुलं अशी सहा सदस्यांची मंडळी होती. मोठा भाऊ नागपूरला नोकरी करतो तर मोठी बहीण सासरी आहे. अशा परिस्थितीत सचिन आणि त्याची आई घरात एकटेच होते.

सचिनवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंमुर्डा शाखेकडून दोन लाख बहात्तर हजार सहाशे रुपये (₹२,७२,६००) कर्ज होते. शेतीचे नुकसान झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची चिंता या तरुण शेतकऱ्याला पडली आणि त्याने हा मार्ग अवलंबला.

आत्महत्येनंतर सचिनची आई एकटी राहिली आहे. "माझा पती गेला, मोठा मुलगा बाहेर आहे, मुलगी सासरी आहे. आता माझ्या एकटीच्या जीवनाचा काय?" अशी हाक हतबल आई देत आहे.

या प्रकरणाने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणि शेती संकटाची गंभीरता पुन्हा एकदा उघडकीला आली आहे.



Comments