नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर

नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन;  दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर   वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.   दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.  अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित  कारवाई करावी. उन्हाळ...

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा - शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या बोजामुळे एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सचिन जगन खेवले (वय २८ वर्षे) यांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक नष्ट झाल्याने निराश होऊन आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

सचिन वरोरा तालुक्यातील जामणी गावाचा रहिवासी होता. कोरोना काळात त्यांचे वडील गेल्याने शेतीची सर्व जबाबदारी सचिनवर आली होती. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुलं अशी सहा सदस्यांची मंडळी होती. मोठा भाऊ नागपूरला नोकरी करतो तर मोठी बहीण सासरी आहे. अशा परिस्थितीत सचिन आणि त्याची आई घरात एकटेच होते.

सचिनवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंमुर्डा शाखेकडून दोन लाख बहात्तर हजार सहाशे रुपये (₹२,७२,६००) कर्ज होते. शेतीचे नुकसान झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची चिंता या तरुण शेतकऱ्याला पडली आणि त्याने हा मार्ग अवलंबला.

आत्महत्येनंतर सचिनची आई एकटी राहिली आहे. "माझा पती गेला, मोठा मुलगा बाहेर आहे, मुलगी सासरी आहे. आता माझ्या एकटीच्या जीवनाचा काय?" अशी हाक हतबल आई देत आहे.

या प्रकरणाने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणि शेती संकटाची गंभीरता पुन्हा एकदा उघडकीला आली आहे.



Comments