वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

युवा शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा - शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या बोजामुळे एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सचिन जगन खेवले (वय २८ वर्षे) यांनी गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक नष्ट झाल्याने निराश होऊन आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

सचिन वरोरा तालुक्यातील जामणी गावाचा रहिवासी होता. कोरोना काळात त्यांचे वडील गेल्याने शेतीची सर्व जबाबदारी सचिनवर आली होती. त्याच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन मुलं अशी सहा सदस्यांची मंडळी होती. मोठा भाऊ नागपूरला नोकरी करतो तर मोठी बहीण सासरी आहे. अशा परिस्थितीत सचिन आणि त्याची आई घरात एकटेच होते.

सचिनवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या टेंमुर्डा शाखेकडून दोन लाख बहात्तर हजार सहाशे रुपये (₹२,७२,६००) कर्ज होते. शेतीचे नुकसान झाल्यामुळे हे कर्ज फेडण्याची चिंता या तरुण शेतकऱ्याला पडली आणि त्याने हा मार्ग अवलंबला.

आत्महत्येनंतर सचिनची आई एकटी राहिली आहे. "माझा पती गेला, मोठा मुलगा बाहेर आहे, मुलगी सासरी आहे. आता माझ्या एकटीच्या जीवनाचा काय?" अशी हाक हतबल आई देत आहे.

या प्रकरणाने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट आणि शेती संकटाची गंभीरता पुन्हा एकदा उघडकीला आली आहे.



Comments