प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

वरोरा प्रभाग २ मध्ये मोठी राजकीय घडामोड: भाजपमध्ये झाला सामूहिक प्रवेश, विकासाचा आणि ऐक्याचा पाठपुरावा

वरोरा प्रभाग २ मध्ये मोठी राजकीय घडामोड: भाजपमध्ये झाला सामूहिक प्रवेश, विकासाचा आणि ऐक्याचा पाठपुरावा

वरोरा : वरोरा नगरपरिषद प्रभाग क्र. २ मध्ये आज भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत सामूहिक पक्षप्रवेश केला. या घटनेद्वारे प्रभागात विकासाच्या वाटचालीला नवी उंची मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.
आमदार करण भाऊ देवतळे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर दृढ विश्वास टाकत, तसेच बाळूभाऊ पिसाळ, वैभवजी लोहकरे आणि सौ. वर्षाताई मंगेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खालील व्यक्तींनी भाजपमध्ये विश्वासपूर्वक प्रवेश केला:

· कार्तिक विरुटकर,· सूरज निखाते· भारत लोहकरे
· प्रणय पोद्दार· संदीप येणगंदेवार· नासेन तितरे· अंकुश नाईक· सुयोग धोपटे· सौरभ मोरे· प्रथम हरणे· हर्ष लोहकरे· प्रदीप दुर्गे· आशिष डोंगरे· गणपत मरासकोल्हे· मंगेश निखाडे· मनीष भगत· आदित्य पेंदोर· सुमीत फुलझेले· गोलू येलके· दिनेश ढुमने

यांच्या सामूहिक प्रवेशामुळे प्रभागातील ऐक्य, उमेद आणि विकासाचा दृढ निर्धार अधिक बळकट झाल्याचे मानण्यात येत आहे. भाजपने जाहीर केले की, आगामी निवडणुकीत निर्णायक बदलाची दिशा स्पष्टपणे दिसू लागली आहे. 
...........

Comments