प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा

*सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा*

चंद्रपूर, दि. 21 : जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत, चंद्रपूर तर्फे सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी/पदयात्रेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रा. डॉ. गुरुदास बाल्की, एन.एस.एस. जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.

कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद  काटकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. माध्यमशेट्टीवार, जिल्हा युवा अधिकारी, मेरा युवा भारत सुशिल भड, कॅप्टन डॉ. सतिश कन्नाके, प्रा. डॉ. कुलदीप गोंड, एन.एस.एस. समन्वयक,  मोरेश्वर गायकवाड, क्रीडा अधिकारी, समन्वयक मंगेश डुबे उपस्थित होते.

उद्घाटन प्रा. डॉ. बाल्की यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारत एकीकरणातील कार्य स्मरण करून युवकांना राष्ट्रीय एकता, विकास आणि सेवा यांचा संदेश दिला. पदयात्रेच्या प्रारंभी प्राचार्य प्रा. डॉ. काटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय एकता दिवस शपथ, आत्मनिर्भर भारत संकल्प आणि नशामुक्ती प्रतिज्ञा उपस्थित युवक-युवतींना देण्यात आली. कार्यक्रमात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य यांचेही आयोजन करण्यात आले.  या पदयात्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या 500 युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुशिल भड यांनी केले. संचालन डॉ. पुरुषोत्तम माहुरे यांनी तर आभार  प्रा. डॉ. कुलदीप गोंड यांनी मानले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सोहेल, यश आसुटकर, मारोती बोबाटे, खोमेश भड व मंगेश भट यांनी मेहनत घेतली.

Comments