प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.


चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरनंतर चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय रचला. हा दिवस बौद्ध समाजासाठी तसेच सामाजिक समतेच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानला जातो.
दरवर्षी या दिवशी देशभरातून लाखो आंबेडकरी बांधव आणि बौद्ध धर्मीय चंद्रपूरच्या या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमतात. मात्र, या पवित्र दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या दिवशी रजा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे १६ ऑक्टोबर हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षा दिनाचे महत्त्व लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना या दिवसाचा सन्मान करता यावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे सुलभ होईल असे म्हटले जात आहे.

Comments