वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वरोरा येथे पीएम धनधान्य योजना व नैसर्गिक शेती अभियानांचा शुभारंभ

वरोरा येथे पीएम धनधान्य योजना व नैसर्गिक शेती अभियानांचा शुभारंभ

वरोरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान यांच्या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज वरोरा येथे पार पडले. या कार्यक्रमास आमदार करन देवतळे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे स्थळ मोहबाळा रोड येथील कृषि उत्पन्न बाजार समिती होते. शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल होणार आहे.

शेतीचा दर्जा उंचावणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून 'आत्मनिर्भर भारत' घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

Comments