वरोरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व कडधान्य अभियान यांच्या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आज वरोरा येथे पार पडले. या कार्यक्रमास आमदार करन देवतळे यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे स्थळ मोहबाळा रोड येथील कृषि उत्पन्न बाजार समिती होते. शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ होऊन, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल होणार आहे.
शेतीचा दर्जा उंचावणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून 'आत्मनिर्भर भारत' घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
Comments
Post a Comment