वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

विनम्र उत्सव, समर्पित सेवा: नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्याला वाहिला गेला विशेष दिवसश्री रवींद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

विनम्र उत्सव, समर्पित सेवा: नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्याला वाहिला गेला विशेष दिवस

श्री रवींद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला. 

भद्रावती 
चेतन लूतडे 


चंद्रपूर : राज्यातील विविध भागांतील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव ठेवत एका विशेष दिवसाचा वाढदिवस धुमधडक्याने साजरा करण्याऐवजी तो लोकसेवेला अर्पण करण्यात आला. या निमित्ताने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.

या कार्यक्रमात, एका मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या आदर्श संस्थेमार्फत आदर्श कृषी केंद्रांतर्गत कार्यरत 'आदर्श शेतकरी बचत गट' या संस्थेला एक ट्रॅक्टर देण्यात आला. तसेच, शैक्षणिक गरजेपोटी काही गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने राबवल्या गेलेल्या योजनांतर्गत एकूण ३३ गरजू लोकांना विविध कारणांसाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यात आले, तर २३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या 'दत्तक' घेण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहिर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया (चिमूर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), देवराव भोंगळे (राजुरा), बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, विधानसभा प्रमुख डॉ. रमेश राजुरकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर तसेच युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रघुवीर अहिर यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाद्वारे समाजातील विविध हस्तींनी सामूहिक समाजसेवेचे एक उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे.

Comments