वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

अखेर त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित.

अखेर त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित.      

  माढेळी: येथील एका कृषी केंद्र संचालकाने शेतकऱ्याला नगदी पावती फाडूनही युरिया खत देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे केलेली होती त्या तक्रारीची दखल घेऊन कृषी केंद्राची तपासणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे पाठविण्यात आला होता त्या अनुषंगाने वरिष्ठांनी त्या कृषी केंद्राच्या परवाना एक महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश पारित केलेला आहे.       
                 
                    माढेळी येथील सुनील कोहपरे या शेतकऱ्याने त्रिमूर्ती कृषी केंद्रातून जून महिन्यामध्ये युरिया खताच्या 15 बॅगची खरेदी केली होती व त्याची पावती सुद्धा कृषी केंद्र संचालकाने फाडून दिली परंतु खत साठा उपलब्ध नसल्याने युरिया खत देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे व जादा दराने खत घ्यावे लागेल असे शेतकऱ्यास सांगितल्यामुळे सुनील कोहपरे या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे तक्रार केली केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या अनुदानित खताची विक्री शेतकऱ्यांना पॉस मशीन द्वारे करणे अनिवार्य केलेले आहे शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार एम एस वरभे गुण नियंत्रण कृषी अधिकारी वरोरा यांनी 15 सप्टेंबरला कृषी केंद्राची तपासणी करून तीन दिवसात खुलासा सादर करण्याबाबत कृषी केंद्र संचालकास सांगितले त्यानुसार कृषी केंद्र संचालकाने 18 सप्टेंबरला आपला खुलासा सादर केला त्यानंतर पंचनामा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला होता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी 26 सप्टेंबरला सुनावणी घेऊन त्रिमूर्ती कृषी केंद्र संचालकास बाजू मांडण्यास सांगितले त्यानुसार कृषी केंद्र संचालकांनी आपली बाजू मांडली खत (नियंत्रण) आदेश 1985 चे खंड 35 (1)(a) व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम ३(२)(i) चे उल्लंघन केल्याने सदर कृषी केंद्राचा रासायनिक खत किरकोळ विक्री परवाना 26 सप्टेंबर 2025 पासून पुढील एक महिन्यासाठी निलंबित करण्यात येत असून त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे

Comments