प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चेतन लूतडे 

चंद्रपूर - जिल्ह्यातील पीककर्जदार शेतकरी सभासदांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत ऐतिहासिक व्याज सवलत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी संस्था स्तरावर थकीत असलेले पीक कर्ज व रुपांतर कर्जदार सभासद पात्र राहतील.

योजनेनुसार, संस्थेने आकारलेल्या मुख्य व्याजातून उचल तारखेपासून ७% दराने आकारलेले व्याज वजा करुन उर्वरित रक्कम व्याज सवलतीसाठी दिली जाईल. सभासदांना कर्जाची उचल तारखेपासून वसुली भरणा करण्यापर्यंत ७% दराने आकारलेले व्याज आणि मुद्दल रक्कमेचा एकमुस्त भरणा करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, मरण पावलेल्या कर्जदार सभासदांसाठी त्यांच्या वारसदारांनी संपूर्ण मूलधन आणि मरणाआधीच्या दिवशीपर्यंतचे व्याज भरल्यास, मरणाच्या दिवशीपासून आकारलेले संपूर्ण व्याज माफ करण्यात येईल.
ही योजना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार असून, योजनेच्या अटी व शर्थी बँकेच्या धोरणानुसार असतील. अध्यक्ष मा.श्री. रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष मा.श्री. संजय डोंगरे व श्री राजेश्वर कल्याणकर संचालक मंडळ यांनी ही योजना अमलात आणली आहे.
प्रमुख कार्यालय : सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर-४४२४०१
कृषी क्षेत्रात आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठे लाभदायक पाऊल ठरणार आहे.
*********

Comments