वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय : शेतकरी सभासदांसाठी व्याज सवलत योजना सुरू

चेतन लूतडे 

चंद्रपूर - जिल्ह्यातील पीककर्जदार शेतकरी सभासदांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९४ वर्षांच्या यशस्वी वाटचालीत ऐतिहासिक व्याज सवलत योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी संस्था स्तरावर थकीत असलेले पीक कर्ज व रुपांतर कर्जदार सभासद पात्र राहतील.

योजनेनुसार, संस्थेने आकारलेल्या मुख्य व्याजातून उचल तारखेपासून ७% दराने आकारलेले व्याज वजा करुन उर्वरित रक्कम व्याज सवलतीसाठी दिली जाईल. सभासदांना कर्जाची उचल तारखेपासून वसुली भरणा करण्यापर्यंत ७% दराने आकारलेले व्याज आणि मुद्दल रक्कमेचा एकमुस्त भरणा करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, मरण पावलेल्या कर्जदार सभासदांसाठी त्यांच्या वारसदारांनी संपूर्ण मूलधन आणि मरणाआधीच्या दिवशीपर्यंतचे व्याज भरल्यास, मरणाच्या दिवशीपासून आकारलेले संपूर्ण व्याज माफ करण्यात येईल.
ही योजना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार असून, योजनेच्या अटी व शर्थी बँकेच्या धोरणानुसार असतील. अध्यक्ष मा.श्री. रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष मा.श्री. संजय डोंगरे व श्री राजेश्वर कल्याणकर संचालक मंडळ यांनी ही योजना अमलात आणली आहे.
प्रमुख कार्यालय : सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर-४४२४०१
कृषी क्षेत्रात आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठे लाभदायक पाऊल ठरणार आहे.
*********

Comments