प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आमदार देवतळे यांचे आवाहन

चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आमदार देवतळे यांचे आवाहन

भद्रावती – कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या उपबाजार आवार चंदनखेडा येथे आज शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शेतमाल खरेदीचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करण संजय देवतळे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्रभाऊ शिंदे होते.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती श्री. राजेंद्र गजानन डोंगे आणि उपसभापती सौ. अश्लेषा मं. भोयर (जीवतोडे) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिक विक्रीसाठी बाजारात आणले आहे. या मालाला योग्य भाव देण्याचे आवाहन आमदार देवतळे यांनी व्यापारी वर्गाला केले.

 ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी शेतमाल विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्य भाव सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.कार्यक्रमादरम्यान शेतमाल विक्रीसाठी सर्वप्रथम सोयाबीन आणल्याबद्दल पारोधी येथील रामदास रामटेके, चंदनखेडा येथील विठ्ठल जीवतोडे आणि पारोधी येथील वामन विरुटकर या शेतकऱ्यांचा आमदार करण देवतळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि ‘ग्रामगीता’ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

Comments