वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आमदार देवतळे यांचे आवाहन

चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आमदार देवतळे यांचे आवाहन

भद्रावती – कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या उपबाजार आवार चंदनखेडा येथे आज शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शेतमाल खरेदीचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करण संजय देवतळे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्रभाऊ शिंदे होते.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती श्री. राजेंद्र गजानन डोंगे आणि उपसभापती सौ. अश्लेषा मं. भोयर (जीवतोडे) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिक विक्रीसाठी बाजारात आणले आहे. या मालाला योग्य भाव देण्याचे आवाहन आमदार देवतळे यांनी व्यापारी वर्गाला केले.

 ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी शेतमाल विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्य भाव सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.कार्यक्रमादरम्यान शेतमाल विक्रीसाठी सर्वप्रथम सोयाबीन आणल्याबद्दल पारोधी येथील रामदास रामटेके, चंदनखेडा येथील विठ्ठल जीवतोडे आणि पारोधी येथील वामन विरुटकर या शेतकऱ्यांचा आमदार करण देवतळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि ‘ग्रामगीता’ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

Comments