वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

वाघाने नागरिकांच्या दृष्टीसमोर ओढून नेला शेतकऱ्याचा बैल; सिताराम पेठेत दहशत

वाघाने नागरिकांच्या दृष्टीसमोर ओढून नेला शेतकऱ्याचा बैल; सिताराम पेठेत दहशत

वरोरा 
चेतन लूतडे 

सिताराम पेठ :  चंद्रपूर जिल्ह्यातील  मोहर्ली परिसरातील सिताराम पेठ गावामध्ये वाघांचे थैमान  सुरूच असून शेतकरी आणि नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी दुपारी एका वाघाने शेतकऱ्याचा बैल नागरिकांच्या दृष्टीसमोर ओढून नेण्याची भीतीदायक घटना घडली.

ही घटना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी सुमारे ४:३० वाजता सिताराम पेठ, बीट क्रमांक ९५६ येथील मोहूर्ली गेटजवळ झाली. अजब पेंदाम यांचा बैल वाघाने हल्ला करून ओढून नेला. हे दृश्य इतके भयानक होते की, ते पाहणाऱ्या नागरिकांचा थरका उडाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा वाघ 'भीमा' नावाचा असावा.
या घटनेमुळे गावकरी आणि शेतकरी समुदाय गंभीर चिंतेत बुडाले आहेत. शेतातील कामे करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. शाळा-कॉलेजात जाणारे विद्यार्थी आणि इतर नागरिक सायकलने फिरताना दहशतीच्या सावटाखाली आहेत. वाघांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण समुदाय भयभीत झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वनविभागाचे केलेले प्रयत्न या परिस्थितीवर मात करण्यासाठी अपुरे पडत आहेत.

स्थानिकांच्या मते, 'टायगर सी-थ्री' यांचे कुटुंबातील हे सर्व वाघ असून, त्यांचे कुटुंब मोठे झाल्यामुळे या परिसरात वाघांची उपस्थिती आणि भीती नेहमीच राहते. नागरिकांच्या समोरूनच वाघांनी शेतकऱ्यांची जनावरे आणि कधीकधी माणसंसुद्धा ओढून नेण्याच्या घटना घडल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
येथील काही वाघ इतर ठिकाणी हलवण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.


Comments