प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळवावे. 


वरोरा : वरोरा तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथे सोयाबीन पिकाच्या नाशामुळे झालेल्या आर्थिक संकटातून घायाळ झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वन दिले.
: जामगाव बुद्रुक येथे राहणारे केशव देवराव आसुटकर या शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पिकाचे दाणे काळे पडलेले पाहिले. पीक नष्ट झाल्यामुळे मजुरांना देण्यासाठी पैसे नसणे, कुटुंबाचा आर्थिक डोलारा आणि बँकेचे कर्ज या चिंतेने ग्रासलेल्या केशव आसुटकर यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींवर मोठा आघात झाला असून कुटुंबप्रमुखाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन सांत्वन पर भेट दिली . यावेळी मत्ते यांनी म्हटले की, सध्या सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्गावर मोठा आघात झाला आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडे मागणी केली की, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढू शकतात. या गंभीर परिस्थितीला सरकारने लगेच तोंड द्यावे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी. व कृषी उत्पन्न बाजार समितीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ वीस हजाराची मदत करण्याचे नियोजन करावे अशी मागणी  मते यांनी केली आहे.

याप्रसंगी बोर्डा ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण बोरूले, उमेश देशमुख , प्रवीण बदकी, लक्ष्मण ठेंगणे, शंकर ढानके, अक्षय ताजने, प्रशांत ताजने, वाल्मीक ऊमरे आधी ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments