वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे?

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?

वरोरा :30/10/2025
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरा  ते भद्रावती दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून रहिवाशांसाठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, स्थानिक लोक सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेवर नाराज दिसत आहेत.

बारा ऑक्टोंबर ला टाकळी जवळील रस्त्यावर श्री. संदीप धरणेवार यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना आणि त्यांच्या मित्राला तीव्र इजा झाल्या. अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल करण्यात आले, जेथे त्यांच्या उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपये इतका प्रचंड खर्च आला आहे.

श्री. धरणेवार यांच्या प्रकरणीच नव्हे, तर भद्रावती येथील आणखी ३ ते ४ व्यक्तींचे अशाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झालेले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, मागील बऱ्याच महिन्यापासून रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचे जीविन दररोज धोक्यात आहे.

या संदर्भात एका स्थानिक नागरिकाने म्हटले आहे, "सरकारी यंत्रणा कोणाच्या मरणाची वाट बघत आहे का?" त्याने सोशल मीडिया ग्रुपमधील विविध पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून केलेल्या विनंतीत म्हटले आहे, "आपण सर्व लोक समाजाची सेवा करण्यासाठी धडपडत आहात. ही पण एक सेवाच आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडे कडक पावले उचलावीत."

या रस्त्याकडे जनप्रतिनिधीने लक्ष देऊन काम करून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त रुग्णांनी स्थानिक प्रशासनाकडे हस्तक्षेपाची कडकडीची विनंती केली असून, लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
------------

Comments