प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

चरूरखटीत: विजेच्या अनधिकृत कुंपणामुळे शेतकरी व निलगायीचा मृत्यू


चरूरखटीत: विजेच्या अनधिकृत कुंपणामुळे शेतकरी व निलगायीचा मृत्यू

वरोरा : तालुक्यातील चरूर खटी गावात रविवारी एका शेतात अनधिकृत पद्धतीने लावलेल्या विजेच्या कुंपणामुळे एका शेतकऱ्याचा तसेच एका निलगायीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीवर आली आहे. ही घटना रविवारी घडली असून, सोमवारी सकाळी तपासातून ही माहिती मिळाली.

मृत शेतकऱ्याची ओळख कवडू शंकर मोडक (५०) अशी आहे. रविवारी सकाळी ते बकऱ्या चारण्यासाठी शेतात गेले होते, परंतु संध्याकाळी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. सोमवारी सकाळी वामन तुळशीराम धाबेकर यांच्या शेतात त्यांचे निर्जीव शरीर आढळले. तपास दरम्यानच त्या शेतातच विजेच्या धक्क्याने मेलेली एक निलगायही आढळली.

शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी कुंपणाला अनधिकृत विजेचा कनेक्शन देतात, पण अशा निष्काळजी कृतीमुळे माणसांसह वन्यजीवांचेही प्राण जातात. या घटनेने अशा धोकादायक पद्धतींवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस तसेच विजेच्या वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वनविभागाने निलगायीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पोलिसांनी प्रकरणाचा पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात शेतकुंपणात अनधिकृतरीत्या वीजप्रवाह सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.
---

Comments