प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अहेतेशाम अली यांची नियुक्ती

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अहेतेशाम अली यांची नियुक्ती

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी अहेतेशाम अली यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

सुभाष धोटे यांनी सांगितले की, "अहेतेशाम अली यांनी सामाजिक कार्यात नेहमीच धडाडीने काम केले असून काँग्रेस पक्षाची संघटना बांधण्यासाठी व जनतेच्या प्रश्नांबाबत जागरूकतेने कार्य केले आहे. त्यांचे कार्यकौशल्य लक्षात घेता त्यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा अनुभव नक्कीच उपयुक्त ठरेल. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी जोमाने प्रयत्न करावे, अशीच अपेक्षा केली आहे."
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदावर अहेतेशाम अली यांची नियुक्ती झाल्याबद्दल खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांसह समस्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. 

अली यांनी दिवाळी सणानिमित्त सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन केले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचे वचन दिले.

Comments