वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल

जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे  बाधितांना विशेष मदत पॅकेज  व सवलती घोषित 

चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल 

चेतन लूतडे 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बरेच मोर्चा आंदोलने आणि सरकारला निवेदन दिल्यानंतर नऊ सप्टेंबरला आलेल्या सरकारच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित यादीमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी  थोडा दिलासा मिळणार असून स्थानिक आमदार करण देवतळे यांनी सरकारचे आभार मानले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात  अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली होती. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपिक नुकसान, शेतजमीन  खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू/साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे । बाधित / तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरविण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासन द्वारे करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार जून ते  सप्टेंबर २०२५ या कालावधीत २५३ तालुक्यामधील शेतीपिक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक  व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना / आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज (Relief Package) व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिशिष्ट अ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुक्यांना ही मदत मिळणार असल्याचे आदेश सरकारतर्फे जारी करण्यात आले आहे.
*********************

Comments