वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*ताडोबा प्रवेश शुल्क कपातीसाठी 'जिप्सी प्रवेश बंद' आंदोलन !*

*ताडोबा प्रवेश शुल्क कपातीसाठी  'जिप्सी प्रवेश बंद' आंदोलन !*

*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचा निर्णायक एल्गार; ताडोबाच्या दारातून एकाही जिप्सीला आत सोडणार नाही*

जाहिरात
-------------------------------------------------
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) स्थानिकांना होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली , १ ऑक्टोबर २०२५ पासून तीव्र आंदोलन सुरू होणार आहे. स्थानिकांसाठी प्रवेश शुल्क कमी न केल्यास, नवीन पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी ताडोबातील जिप्सी सफारी पूर्णपणे थांबवण्यात येईल, असा स्पष्ट आणि अंतिम इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.

वाघांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या स्थानिकांवरच आर्थिक भुर्दंड

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या गंभीर असताना, त्याच जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर झोनमध्ये शनिवार-रविवारसाठी तब्बल १२,६०० इतके अवाच्यासवा प्रवेश शुल्क आकारले जात आहे. या अन्यायामुळे स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा दर्शन हे केवळ 'स्वप्न' बनले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, "जे नागरिक वाघांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावत आहेत, त्यांनाच वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. ताडोबामुळे जिल्ह्याची ओळख आहे, पण आज ताडोबा येथील लोकांनाच परका झाला आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही."

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठामपणे सांगितले आहे की, हा इशारा केवळ एक मागणी नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले मोठे आणि निर्णायक आंदोलन असेल. शासनाने तातडीने दखल घेऊन स्थानिकांना न्याय द्यावा, अशी तीव्र अपेक्षा आहे.


*******

Comments