प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

गणेशोत्सवात वरोरा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश

गणेशोत्सवात वरोरा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश

वरोरा : वरोरा शहराने पुन्हा एकदा गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन घडवत हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जोपासली. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त वरोरा मुस्लिम एकता मंचतर्फे सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. कच्ची मस्जिदजवळ उभारलेल्या मंडपात मुस्लिम समाजबंधूंनी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलिस अधिकारी तसेच जनप्रतिनिधी यांचा शाल, गुलदस्ता आणि श्रीफळ देऊन सन्मान केला.


ऐक्याचा उत्सव

वरोरा शहर हे नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि शांततेचे प्रतीक राहिले आहे. येथे मोहर्रम, ईद-मिलाद, होळी, दिवाळी यांसारखे धार्मिक उत्सव सर्वजण मिळून साजरे करतात. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा गणेशोत्सवातही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला. शुभयात्रेत गणेश मंडळांच्या स्वागताने "एकता आणि बंधुभाव" यांचा संदेश पसरवला.

उपस्थित मान्यवर

या प्रसंगी वरोरा मुस्लिम एकता मंचाचे अध्यक्ष सैय्यद आसिफ रजा, ऑल इंडिया कौमी तंजीम संघटनेचे अध्यक्ष छोटूभाई शेख, नियाज सैय्यद, वसिम शेख, अन्सार रजा, मोहसीन पठाण, शब्बीर शेख, एड. तनवीर तहूर शेख, फारुख भाई, सय्यद शुजात यांच्यासह समाजातील असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावनेचा दुवा

या उपक्रमातून गणेशोत्सव केवळ धार्मिकतेचा नव्हे, तर सामाजिक ऐक्य आणि एकमेकांविषयी सद्भावना जोपासण्याचा संदेश देतो हे पुन्हा सिद्ध झाले. गणपती बाप्पाच्या स्वागताचा आनंद आणि मुस्लिम समाजाचे बंधुत्वभावाचे दर्शन या माध्यमातून सर्वांनाच भावले.

...........


Comments