प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

नितीन मते आणि डुकरे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन.प्रशासनाची तारांबळ उडाली.

जिल्हाप्रमुख नितीन मते आणि डुकरे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन.

प्रशासनाची तारांबळ उडाली. 

वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन मंगळवारी आनंदवन चौक येथे करण्यात आले.

बाजार समितीचे संचालक  नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात चिमूर रोडवरील आनंदवन चौकामध्ये शेतकऱ्यांनी रोड जाम करून सरकार विरोधी घोषणा देत रस्ता बंद केला. यावेळी पोलीस प्रशासनाचा चोक बंदोबस्त असून ठाणेदार अजिंक्य तांबडे यांनी घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी समजण्याच्या परिस्थितीत नव्हते. नितीन मते आणि किशोर डुकरे यांनी शेतकऱ्यांना संबोधन करीत रस्ता अडवून धरला होता.
शेतकऱ्यांनी जेलभरो आंदोलन असल्याचे सांगून पोलिसांनी आम्हाला अटक करावी. अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आनंदवन चौकातील आंदोलन उग्र होत चालले होते. उपविभागीय अधिकारी बकाल यांनीओ समजावण्याचा प्रयत्न केला . मात्र आंदोलन तीव्र करीत आनंदवन चौक ते पोलीस स्टेशन वरोरा लगभग तीन किलोमीटर  मार्गावर सर्व शेतकरी चालत जाऊन वरोरा पोलीस स्टेशन गाठले. मात्र वरोरा पोलीसांनी आंदोलकास आतमध्ये येण्यास मज्जाव केल्याने आंदोलन तीव्र झाले. आंदोलकांचा मोर्चा तहसील कार्यालयात वळला. बराच काळ या ठिकाणी आंदोलक बसून राहले. मागील बरंच वेळापासून  हीच परिस्थिती तहसील कार्यालयामध्ये दिसून आली. आंदोलन तहसील कार्यालयाच्या परिसरात ठिय्या मांडून बसले होते.

वरोरा उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी वरिष्ठासोबत संपर्क साधून शेतकऱ्याचे निवेदन स्वीकारले. सोयाबीन हे पिक महिन्यापासून पाण्यामध्ये असल्यामुळे  मूळ सड आणि खोड सड याची पाहणी करून तात्काळ त्याचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी मते यांनी केली आहे . यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी  संध्याकाळी आंदोलन थांबविले.


*****





Comments