वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला

वरोरा येथे खूनाचा प्रयत्न: फोन का उचलत नाही म्हणून विवाहितेवर चाकूहल्ला वरोरा, ता. ४ मार्च : "तू माझ्याशी बोलत का नाही? माझा फोन का उचलत नाही?" असे म्हणत एका तरुणाने एका विवाहित महिलेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी उघडकीस आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील यात्रा वार्ड प्रभाग सात मधील परिसरात ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, ४० वर्षीय राखी अजय लिहितकर या सहा वर्षांपूर्वी भद्रावती येथील एका पेट्रोल पंपावर कार्यरत होत्या. तेथेच त्यांची ओळख विक्की बावणे याच्याशी झाली होती. तेव्हापासून विक्की हा राखी यांना भेटण्यासाठी येत असे आणि वारंवार फोन करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून राखी यांनी याबाबत आपले पती अजय लिहितकर यांना माहिती दिली. अजय यांनी विक्कीला ताडून पुन्हा फोन न करण्याची धमकी दिली. मात्र, धुळवंदनाच्या दिवशी विक्की हा थेट राखी यांच्या घरी पोहोचला. राखी यांनी दरवाजा उघडताच, विक्कीने "तू माझा फोन का उचलत नाही? तुझा मर्डर करून टाकीन," अशी भीषण धमकी देत कंबरेतून चाकू काढून...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे भद्रावती येथे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे भद्रावती येथे उद्घाटन
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न

वरोरा 
चेतन लूतडे 

भद्रावती : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' व महिला सक्षमीकरणासाठीच्या 'आदिशक्ती अभियान' अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी जे. के. पॅलेस, भद्रावती येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भूषवले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत हीच गावाच्या विकासाची खरी किल्ली असून, राज्य व केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जनजागृती करून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 'आदिशक्ती अभियान' ही काळाची गरज आहे.

या महत्त्वाच्या कार्यक्रमाला तहसीलदार श्री. राजेश भंडारकर, पोलीस अधिक्षक श्री. योगेश पारधी, गटविकास अधिकारी श्री. आशुतोष सपकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पुनम गोडाम, जनप्रतिनिधी श्री. बंडू आकनुरवार, श्री. ओमकेश दराडे, डॉ. दिपक बिहातिया, श्रीमती छायाताई जंगम, श्री. मंगेश भोयर, श्री. बंडू नलावरे, श्रीमती चालेकर, श्रीमती भागवत, डॉ. शाहीज सय्यद, श्री. प्रकाश खरवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेद्वारे दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आणि ग्रामीण भागातील विकास व महिला सक्षमीकरणाला गती देण्याचे ठरविण्यात आले.



Comments