वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

मोरवा गावातील रक्तकर्करोगग्रस्त बालक प्रितमला आर्थिक मदत व समाजभूषणांचा सन्मान

मोरवा गावातील रक्तकर्करोगग्रस्त बालक प्रितमला आर्थिक मदत व समाजभूषणांचा सन्मान

वरोरा 
डॉ. मनोज तेलग

मोरवा (वि.) — गावातील पाच वर्षीय चिमुकला प्रितम अनिल उमाटे याला ब्लडकॅन्सर (रक्तकर्करोग) असून त्यासाठी दरमहा नागपूरला केमोथेरपीसाठी जावे लागते. कोरोना काळात वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ही वस्तुस्थिती समजताच जिल्हा परिषदेच्या मोरवा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून मदत करण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजल्यावर साहित्यिक कवी अशोक वर्मा, उपविभागीय अभियंता एल. व्ही. घागी, प्रभाकर मस्के, विश्वदीप गोंडाने, अर्जुन चव्हाण यांसारख्या दानवीरांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोज तेलंग यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी हात पुढे केला.

गावातील सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत प्रितमला आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यात श्रुती थेरे, आयुष वैरागडे, अदिती पिंपळकर, वैदेही सालोडकर यांचा समावेश होता. परिसरातील प्रयोगशील शेतकरी रामभाऊ बुचे (येरूर) यांना कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शालेय साहित्यासाठी विद्यार्थ्यांचा मदतीला हातभार लावणारे गौरव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ कवी अशोक वर्मा यांना डॉ. पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रितमला कायम मदतीचा हात देण्यासाठी तपोवन लेव्हिस्टिक प्रा. लि. (चंद्रपूर) या कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून ३० टक्के रक्कम प्रितम सारख्या गरजूंना देण्यात येईल, असे डॉ. मनोज तेलंग यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी प्रितमला मदत देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल म्हणून पैगाम सामाजिक संस्थेच्या वतीने राहील पटेल, अशोक धात्रक, गौरव पाटील यांनी स्कूल बॅग व नोटबुक देऊन विद्यार्थ्यांचा आभार मानला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन चव्हाण (शिक्षक) यांनी केले, तर प्रास्ताविक त्रिग्य गोंडाने यांनी केले. आभार प्रदर्शन अक्षय काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन साव, रजनी पिदूरकर, शुभांगी थेरे, प्रिती मुसळे, संतोष गेडेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.

***************

Comments