प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

घुग्गुस शहरात सर्वधर्मीय एकतेचा प्रसंग, सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वधर्मीय आरती आणि भाजप नेत्यांचा सहभाग

घुग्गुस शहरात सर्वधर्मीय एकतेचा प्रसंग, सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वधर्मीय आरती आणि भाजप नेत्यांचा सहभाग

घुग्गुस (चंद्रपूर), २ सप्टेंबर २०२५: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात शहरातील सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे भाग घेतला आणि गणपती बाप्पाची आरती केली, त्यामुळे शहरातील सद्भावना आणि धार्मिक एकतेचे संदेश देण्यात आला.
या सर्वधर्मीय आरतीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बुद्ध धर्माच्या धर्मगुरूंनी सहभाग घेतला. घुग्गुस शहरात सर्व धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र राहतात आणि या आरतीद्वारे त्यांच्या एकतेचा प्रत्यय देण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि देवराव भोंगळे यांनी या आयोजनात सहभाग घेतला.

जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने गांधी चौकात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणपती उत्सवादरम्यान समाजात धार्मिक सद्भावना आणि एकतेचा संदेश पोहोचवण्यासाठी या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे शहरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, समाजसेवी आणि राजकीय नेते उपस्थित होते. सर्वधर्मीय आरतीने घुग्गुस शहराने जपलेल्या परंपरेचा पुन्हा एकदा पुरावा दिला आणि धार्मिक सौहार्दाचे संकेत दिले.

Comments