संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के

संस्कार भारती पब्लिक स्कूलची वरोरा तालुक्यात आघाडी; अदिती गायकवाड ९६ टक्क्यांसह प्रथम, शाळेचा निकाल १०० टक्के वरोरा, दि. १६ एप्रिल: येथील संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या शैक्षणिक सत्रातील परीक्षेत तालुकास्तरावर आपला दबदबा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. शाळेची ही कामगिरी उल्लेखनीय ठरली असून विद्यार्थिनी अदिती गायकवाड हिने तब्बल ९६.०० टक्के गुण प्राप्त करून वरोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी एकूण ९० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला असून शाळेचा निकाल १००% लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तब्बल २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. शाळेच्या वतीने अदिती गायकवाड हिचा विशेष सत्कार करण्यात येणार असून तिच्या यशामुळे संपूर्ण वरोरा परिसरात शाळेचे ...

घुग्गुस शहरात सर्वधर्मीय एकतेचा प्रसंग, सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वधर्मीय आरती आणि भाजप नेत्यांचा सहभाग

घुग्गुस शहरात सर्वधर्मीय एकतेचा प्रसंग, सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वधर्मीय आरती आणि भाजप नेत्यांचा सहभाग

घुग्गुस (चंद्रपूर), २ सप्टेंबर २०२५: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात शहरातील सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे भाग घेतला आणि गणपती बाप्पाची आरती केली, त्यामुळे शहरातील सद्भावना आणि धार्मिक एकतेचे संदेश देण्यात आला.
या सर्वधर्मीय आरतीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बुद्ध धर्माच्या धर्मगुरूंनी सहभाग घेतला. घुग्गुस शहरात सर्व धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र राहतात आणि या आरतीद्वारे त्यांच्या एकतेचा प्रत्यय देण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि देवराव भोंगळे यांनी या आयोजनात सहभाग घेतला.

जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने गांधी चौकात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणपती उत्सवादरम्यान समाजात धार्मिक सद्भावना आणि एकतेचा संदेश पोहोचवण्यासाठी या सर्वधर्मीय आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे शहरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, समाजसेवी आणि राजकीय नेते उपस्थित होते. सर्वधर्मीय आरतीने घुग्गुस शहराने जपलेल्या परंपरेचा पुन्हा एकदा पुरावा दिला आणि धार्मिक सौहार्दाचे संकेत दिले.

Comments