वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक.शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल .

वरोऱ्यात पुस्तक विक्रीसाठी ‘सेटिंग’ ? विद्यार्थ्यांना शाळेचा नवीन सेट घेणे बंधनकारक. शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल . वरोरा, ता. 30 (प्रतिनिधी): वरोरा येथील सेंट ॲनिस हायस्कूल प्रशासनावर पुस्तक विक्रीत नफेखोरीचा गंभीर आरोप होत असून, स्थानिक पुस्तक विक्रेत्यांना डावलून बाहेरील विक्रेत्याला प्राधान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात शहरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांनी गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी एकत्र येत गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, सेंट ॲनिस शाळा प्रशासन यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी शाळेमधूनच पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री होत असल्याचा आरोप झाला होता. यानंतरही प्रशासनाने अप्रत्यक्ष मार्गाने पुस्तक विक्री सुरूच ठेवल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेकडून पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर “पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत” असा संदेश पाठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शहरातील कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित या...

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला


वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात येत्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वरोरा शहरातील आंबेडकर चौकात हे आंदोलन भरवण्यात येणार आहे. आयोजकांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या रोगांमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले असतानाच, अलीकडील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात या पिकांनाही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत केलेला नसल्याचेही आरोप केले जातात. भाजपचे कर्जमाफीचे निवडणूकीतील आश्वासनही फेटाळले गेले आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

या आंदोलनाद्वारे शेतकरी चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि शेतमालाला योग्य भाव देणे यासहित अनेक मागण्या करणार आहेत.

Comments