खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला


वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात येत्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वरोरा शहरातील आंबेडकर चौकात हे आंदोलन भरवण्यात येणार आहे. आयोजकांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या रोगांमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले असतानाच, अलीकडील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात या पिकांनाही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत केलेला नसल्याचेही आरोप केले जातात. भाजपचे कर्जमाफीचे निवडणूकीतील आश्वासनही फेटाळले गेले आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

या आंदोलनाद्वारे शेतकरी चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि शेतमालाला योग्य भाव देणे यासहित अनेक मागण्या करणार आहेत.

Comments