वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

व्होल्टास कॉलनीचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी अस्ताव्यस्त; नागरिकांचे आमदारांना निवेदन.

व्होल्टास कॉलनीचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी अस्ताव्यस्त; नागरिकांचे आमदारांना निवेदन. 

अन्यथा न.प. टॅक्स भरणार नाही. 

वरोरा 
अनिल नौकरकार 

वरोरा : वरोरा रेल्वे स्टेशन ते मोहबाळा चौक या मुख्य रस्त्याची दयनीय स्थितीमुळे व्होल्टास कॉलनीतील रहिवाशांना अनेक वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. या नियोजित १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर जागोजागी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक खूपच अवघड झाली आहे. रोजच्या अनेक अपघातांमुळे नागरिक भयभीत आहेत आणि प्रशासनाकडे त्वरित दुरुस्तीची मागणी करत आहेत.
हा रस्ता केवळ व्होल्टास कॉलनीसाठीच नव्हे, तर एमआयडीसीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, शाळकरी मुलांसाठी आणि आजूबाजूच्या खेड्यांमधून येणाऱ्या शेकडो नागरिकांसाठी देखील महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात येथील परिस्थिती आणखीन हलाखीची होते. आनंदवन चौक, सरदार पटेल वार्ड येथील पाणी या कॉलनीत शिरते. नाल्यांची नियमित सफाई न झाल्यामुळे घाण आणि पाणी साचते, ज्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होत आहेत.

कॉलनीतील रहिवासी प्रामाणिकपणे नगरपरिषद कर भरत असतात . टॅक्सचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र गेल्या काही वर्षीपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे स्टेशन चौक ते मोहबाळा चौकापर्यंतचा रस्ता योग्य प्रकारे दुरुस्त करण्यासाठी वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देण्यात आले आहे. या मागणीसाठी बंडूभाऊ लभाने, बंडू कातोरे, अनिल नौकरकार, गजानन महानकर, गोपाल राजपूत, संजय वैद्य, मंगेश मल्हार, अरुण दळवी, रमेश अंड्रस्कर यासहित अनेक रहिवाशांनी आवाज उठवला आहे.

नागरिकांची मागणी आहे की, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे आणि त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा नगरपालिकेचा टॅक्स भरणार नाही असाही इशारा दिलेला आहे.



Comments