प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

राज्यगीत आता बंधनकारक!** शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड


**राज्यगीत आता बंधनकारक!**  

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड 

फक्त बातमी 

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर "गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत बंधनकारकरीत्या गाण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, हा नियम **मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी सह सर्व माध्यमांच्या शाळांना** लागू असेल.

 प्रत्येक शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत सादर करणे अनिवार्य राहील.  
पालन न करणाऱ्या शाळांवर: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे, *"नियम मोडणाऱ्या शाळांवर शासन कठोर कारवाई करेल."  
हा निर्णय शैक्षणिक आदर्शांबरोबरच **राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीला** प्राधान्य देणारा पहिला मोठा कार्यक्रम आहे. "गर्जा महाराष्ट्र माझा" गीतातील शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडलेले असल्याने, त्याचा सामूहिक गायनाने विद्यार्थ्यांमध्ये सामूहिकत्वाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.

शिक्षण विभाग या आदेशाची अंमलबजावणी तातडीने सुरू करणार असून, शाळांना अधिकृत सूचना आधीच पाठवण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत सुरू होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड 

मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यापुढे त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत केली जाईल आणि शालेय विद्यार्थ्यांना आता आरोग्याच्या तपासणीनंतर एक हेल्थ कार्ड दिले जाईल अशी माहिती दिली आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी औपचारिक होती मात्र आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. शिवाय मुलांच्या आरोग्याबाबतचे हेल्थ कार्ड सुद्धा त्यांना दिले जाणार आहे.


Comments