वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

राज्यगीत आता बंधनकारक!** शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड


**राज्यगीत आता बंधनकारक!**  

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड 

फक्त बातमी 

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर "गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत बंधनकारकरीत्या गाण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, हा नियम **मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी सह सर्व माध्यमांच्या शाळांना** लागू असेल.

 प्रत्येक शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत सादर करणे अनिवार्य राहील.  
पालन न करणाऱ्या शाळांवर: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे, *"नियम मोडणाऱ्या शाळांवर शासन कठोर कारवाई करेल."  
हा निर्णय शैक्षणिक आदर्शांबरोबरच **राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीला** प्राधान्य देणारा पहिला मोठा कार्यक्रम आहे. "गर्जा महाराष्ट्र माझा" गीतातील शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडलेले असल्याने, त्याचा सामूहिक गायनाने विद्यार्थ्यांमध्ये सामूहिकत्वाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.

शिक्षण विभाग या आदेशाची अंमलबजावणी तातडीने सुरू करणार असून, शाळांना अधिकृत सूचना आधीच पाठवण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत सुरू होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड 

मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यापुढे त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत केली जाईल आणि शालेय विद्यार्थ्यांना आता आरोग्याच्या तपासणीनंतर एक हेल्थ कार्ड दिले जाईल अशी माहिती दिली आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी औपचारिक होती मात्र आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. शिवाय मुलांच्या आरोग्याबाबतचे हेल्थ कार्ड सुद्धा त्यांना दिले जाणार आहे.


Comments