प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

दोन कुत्र्यांनी एका वाघाला जंगलात पळवले. ताडोबा अभयारण्यात वाघाने गावाजवळ मांडले बस्तान वनविभाग सतर्क.

गावकऱ्यांची सावधगिरी आणि कुत्र्यांचे धाडस, वाघाचा हल्ला निष्फळ.
ताडोबा अभयारण्यात वाघाने गावाजवळ मांडले बस्तान  वनविभाग सतर्क.

वरोरा 
चेतन लूतडे 
चंद्रपूर, (23/8/2025): चेतन लूतडे 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहरली ते मुधोली रस्ता पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले असले तरी, आता तेथे अनेक वाघाच्या उपस्थितीमुळे अशांतता निर्माण झाली आहे. शुक्रवारपासून एका वाघाने सिताराम पेठ गावाजवळ बस्तान मांडले असून गावातील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना धोका निर्माण झाला आहे.

शुक्रवारी दुपारी या वाघाने गाईबैलांच्या कळपावर हल्ला चढवला. याचे चित्रीकरण झाले असून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गाईवर हल्ला केल्यानंतर दोन कुत्र्यांनी मिळून वाघावर चढाई केली यानंतर वाघ जंगलात पळून गेला. गावकऱ्यांच्या सावधतेमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वाघाला शिकार करता आली नाही. असे असले तरी, सिताराम पेठ गावात या वाघाची दहशत पसरली आहे. याबरोबर या ठिकाणी दोन वाघ अजून आहेत. वनविभागाने या संबंधात तातडीने संरक्षण उपाय सुरू केले आहेत.
सिताराम पेठ ते मोहरली या भागात वाघांची संख्या वाढली असून, भर दिवसा पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी गाड्या थांबवण्यास मनाई केली असून, प्रत्येक ठिकाणी वनकर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र, गावातील काही युवक मोठ्या धाडसाने वाघाजवळ जाऊन आरडाओरड करताना दिसून येतात, ज्यामुळे धोक्याची शक्यता वाढली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना व पर्यटकांना सूचना दिल्या आहेत की ते सतर्क राहावेत व वनविभागाच्या मार्गदर्शनाखेरीज धोकादायक क्षेत्रात जाऊ नयेत. ताडोबाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षेच्या खबरदारीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

(सिताराम पेठ येथील युवक मंगेश ढोक यांनी हा व्हिडिओ चित्रीत केले आमच्या पोर्टलतर्फे धन्यवाद)
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा. 
बातम्या पाठवण्यासाठी 9579734429 या नंबर वर संपर्क साधा.

Comments