प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

सीमेवरील जवानांसाठी लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या ....!

सीमेवरील जवानांसाठी लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या ....!

वरोरा दि ७ ऑगस्ट

भारताच्या सीमांचे रक्षण करतांना आपले कुटुंब ,सण - उत्सव आणि व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सर्व नागरिक सुरक्षित आहोत. हा भाव लक्ष्यात घेऊन लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम राबविला.  
      सीमेवर उभा असलेला सैनिक हा वर्दीतला माणूस नाही तर  तो आपल्या श्वासाचे रक्षण करणारा देवदूत आहे.  राखीच्या प्रत्येक धाग्यांमध्ये प्रेम , कृतज्ञता आणि अभिमानाचे प्रतीक असलेली भावना गुंफलेली आहे . या राख्या सैनिकांना केवळ बहीण -भावाच्या नात्याची आठवण करून देणार नाही तर त्यांना पाठिंबा ,प्रेम आणि समाजाकडून मिळणारा सन्मानही जाणवून देतील.  हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणारा असून युवकांना आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता बाळगण्याचा संदेश देणारा आहे असे उद्गार या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक राहुल राखे यांनी काढले. या सर्व राख्या आणि शुभेच्छा पत्र मराठा लाईट इन्फेन्ट्री, बेळगाव सैनिकांना पाठविण्यात आल्या .
     एकूण १३७ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापक दीपक नवले, डॉ प्रशांत खुळे, सेवानिवृत्त कला शिक्षक अविनाश कांबळे ,आकाश धगवे, अभिषेक चिखलीकर, ईश्वर डाबेराव, महेश मोरे, चंद्रशेखर भोयर, अमोल सलवटकर,अंजली वरुडकर,कु. प्रियंका लांडे, बुद्धभूषण टिपले, यांनी सहकार्य केले.


Comments