वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

सीमेवरील जवानांसाठी लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या ....!

सीमेवरील जवानांसाठी लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या ....!

वरोरा दि ७ ऑगस्ट

भारताच्या सीमांचे रक्षण करतांना आपले कुटुंब ,सण - उत्सव आणि व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्यागामुळेच आपण सर्व नागरिक सुरक्षित आहोत. हा भाव लक्ष्यात घेऊन लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सदर उपक्रम राबविला.  
      सीमेवर उभा असलेला सैनिक हा वर्दीतला माणूस नाही तर  तो आपल्या श्वासाचे रक्षण करणारा देवदूत आहे.  राखीच्या प्रत्येक धाग्यांमध्ये प्रेम , कृतज्ञता आणि अभिमानाचे प्रतीक असलेली भावना गुंफलेली आहे . या राख्या सैनिकांना केवळ बहीण -भावाच्या नात्याची आठवण करून देणार नाही तर त्यांना पाठिंबा ,प्रेम आणि समाजाकडून मिळणारा सन्मानही जाणवून देतील.  हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागवणारा असून युवकांना आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता बाळगण्याचा संदेश देणारा आहे असे उद्गार या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचे आयोजक शाळेचे मुख्याध्यापक राहुल राखे यांनी काढले. या सर्व राख्या आणि शुभेच्छा पत्र मराठा लाईट इन्फेन्ट्री, बेळगाव सैनिकांना पाठविण्यात आल्या .
     एकूण १३७ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापक दीपक नवले, डॉ प्रशांत खुळे, सेवानिवृत्त कला शिक्षक अविनाश कांबळे ,आकाश धगवे, अभिषेक चिखलीकर, ईश्वर डाबेराव, महेश मोरे, चंद्रशेखर भोयर, अमोल सलवटकर,अंजली वरुडकर,कु. प्रियंका लांडे, बुद्धभूषण टिपले, यांनी सहकार्य केले.


Comments