वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय: प्रत्येक अतिथीचा ग्रामगीता भेट व भगवी टोपीने स्वागत

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक निर्णय: प्रत्येक अतिथीचा ग्रामगीता भेट व भगवी टोपीने स्वागत

फक्त बातमी 
चेतन लूतडे 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे आणि संचालक मंडळाने एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. आता पुढे बँकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयात कोणीही अतिथी कार्यालयीन किंवा वैयक्तिक भेटीसाठी आला, तर त्याचा सत्कार गुरुदेव सेवा मंडळाची भगवी टोपी आणि युगग्रंथ 'ग्रामगीता' भेट देऊन करण्यात येईल.
जाहिरात
हा निर्णय बँकेच्या पहिल्याच संचालक मंडळ सभेत सर्वमताने मंजूर करण्यात आला. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरीचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे यांनी बँकेच्या अध्यक्ष श्री शिंदे आणि संपूर्ण संचालक मंडळाच्या या निर्णयाचे जाहीर अभिनंदन केले आहे. श्री गमे यांनी असेही अपेक्षित व्यक्त केले की, भविष्यातही बँकेचे हे नेतृत्व गुरुकुंज आश्रमाच्या विविध समाजहितकारी उपक्रमांना सहकार्य करत राहील.

श्री रवींद्र शिंदे हे समाजसेवेच्या भावनेने परिपूर्ण आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जन्मजात समाजसेवेची वृत्ती असलेल्या या नेत्याने आणि त्याच्या संचालक मंडळाने घेतलेला हा निर्णय चिरकाल स्मरणात राहील, अशी समाजमाध्यमांतून प्रतिक्रिया दिली जात आहे.

जाहिरात
.            कल्पतरू गणेश मंडळ, वरोरा
***************************

Comments