वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

*चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांचा सन्मान; राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी शालश्रीफळांनी केला गौरव**

**चंद्रपूर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांचा सन्मान; राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी शालश्रीफळांनी केला गौरव**  

*चंद्रपूर, दि. १२ ऑगस्ट २०२५*
चेतन लूतडे 
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांचा भव्य सत्कार कमल स्पोर्टिंग क्लब येथे स्वर्गीय कालीदास अहीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहीर यांनी शाल व श्रीफळ देऊन श्री. शिंदे यांना गौरविले. हा कार्यक्रम "रक्तदान शिबीर" सोबत आयोजित करण्यात आला होता.
**गणमान्य उपस्थितीत झाला सत्कार:**  
या कार्यक्रमास अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती हजर होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ विधीतज्ञ मा. अॅड. रविंद्र भागवत, विधानसभा सदस्य मा. किशोर जोरगेवार, मा. करण देवतळे, माजी आमदार मा. संजय धोटे, मा. सुदर्शन निमकर, ज्येष्ठ भाजप नेते मा. अशोक जिवतोडे, भाजप जिल्हाध्यक्ष मा. हरीष शर्मा, शहराध्यक्ष मा. सुभाष कासनगोट्टूवार, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा सिव्हिल सर्जन, डॉ. राजू सैनानी, डॉ. एम.जे. खान, डॉ. नरेंद्र कोलते, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, मा. मधुसूदन रुंगटा, मा. दामोदर मंत्री, लाईफलाइन रक्तपेढी (नागपूर)चे डॉ. वरभे, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वाशिमकर तसेच मा. प्रवीण बच्छाव या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरव प्राप्त केला.
**शिंदे यांनी व्यक्त केले आभार:**  
श्री. रविंद्र शिंदे यांनी मा. हंसराज अहीर, उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती तसेच कार्यक्रमाचे आयोजक कमल स्पोर्टिंग क्लब यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी "रक्तदान ही महादानाची घटना आहे" यावर भर देत स्वर्गीय कालीदास अहीर यांच्या विचारांना साजेशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी सर्वांना आवाहन केले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करून समाजकार्यात भाग घेतला.

Comments