वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी

वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी वरोरा, दि. 18 एप्रिल – येथील वनोजा गावाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार चेतन किसनराव चावरे (वय ३६, रा. खौरी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले संदेश बुरडकर (वय ३५) जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चावरे व संदेश बुरडकर हे मोटारसायकल (क्र. MH 36 D 5653) ने वरोराहून खौरीकडे जात होते. माढळीकडून वरोराकडे येणाऱ्या ट्रक चालकाने वेग व निष्काळजीपणा करून त्यांच्या बाईकला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, चेतन चावरे यांचे डोके फुटून मेंदू बाहेर आला व त्यांचा मृत्यू झाला. जखमी संदेश बुरडकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताचे काका विजय रामाजी क्षीरसागर (रा. दहेगाव) यांनी वरोरा पोलिसांत तोंडी रिपोर्ट दिला आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

*"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**

इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला.

**"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**  

११ ऑगस्ट २०२५ : 
फक्त बातमी 

"*मोदी सरकार कायर है... **" या घोषणेखाली सोमवारी इंडिया आघाडीच्या  महिला खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठोस आवाज उठवला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, खासदार प्रतिभा धानोरकर  आणि खासदार वर्षा गायकवाड सह अनेक काँग्रेस महिला खासदारांनी  नारीशक्तीने रस्त्यावर उतरून मतदारांचे हक्क रक्षण्याची हाक दिली आहे.
खासदार प्रियंका वाड्रा  यांच्या नेतृत्वात संसदेच्या रस्त्यावर उतरून निर्वाचन आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले .
खासदार प्रतिभा धानोरकर , आमच्या जिल्ह्यातही दहा ते पंधरा हजार मतदान वाढलेले आहेत. याबाबत आम्ही पिटीशन दाखल करून सुद्धा आम्हाला उत्तर मिळाले नाही. बोगस मतदान झालेल्या प्रकरणात निर्वाचन आयोगाने जनतेपुढे उत्तर द्यावे.

या निषेधाच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी ऐतिहासिक विधान केले:  
One man one vote.
**"वोट कि चोरी नहीं चलेगी!** (मतांची चोरी आता चालणार नाही!) *महाराष्ट्राच्या विधानसभा झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. *महाराष्ट्रामध्ये 40 लाख बोगस वोटर घुसवण्यात आले होते. *मतदार यादी मध्ये बनावट वोटर ची नावे आहेत. गेल्या पाच महिन्यात एक कोटी बोगस मतदान दाखवून भाजप आणि निर्वाचन आयोग यांनी मिळून मते चोरली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच प्रकारे काँग्रेसचे उमेदवार पडले. याच पद्धतीने समोर येणार्या निवडणूका सुद्धा भाजपा जिंकली? असा खळबळ जनक आरोप खासदार राहुल गांधी पत्रकार परिषदेत  केला आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा विश्वास जनतेला त्यांनी दिला आहे. 

 काँग्रेस खासदार व इतर आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे रस्त्यावर झालेल्या प्रदर्शनाने सत्ताधाऱ्यांना स्पष्ट सूचित केले आहे: वोट की चोरी नही चलेगी l "सावित्रीच्या लेकी" आता लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या  आहे.

************


****


Comments