खेमजई येथे बायोचार निर्मितीला सुरुवात

खेमजई  येथे बायोचार  निर्मितीला सुरुवात  20एप्रिल2026:- वरोरा तालुक्यातील खेमजई येथे अंबुजा फाउंडेशन व कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनी चिनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने बायोचार निर्मितीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांच्या हस्ते करण्यात आले.  अंबुजा हवामान बदल प्रकल्पाचे समन्वयक किशोर कोरे यांनी या प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन करून बायोचार  निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.तसेच बायोचार निर्मिती करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी बायोचार वापरण्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले .  यावेळी कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक बळीरामजी डोंगरकर, अंबुजा फाउंडेशन तालुका समन्वयक विश्वास गुल्हाने, ग्राम संघाचे अध्यक्ष वंदना साळवे, उपसरपंच चंद्राहास मोरे, प्रमोद गायकवाड रमेश बावने, ग्रामपंचायत सचिव मेघश्याम येंचलवार, विनायक बावणे इत्यादी उपस्थित होते.या प्रकल्पाला नायब तहसीलदार गिरीष बोर्डे यांनी भेट देऊ...

*"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**

इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला.

**"वोट कि चोरी नहीं चलेगी" – राहुल गांधी**  

११ ऑगस्ट २०२५ : 
फक्त बातमी 

"*मोदी सरकार कायर है... **" या घोषणेखाली सोमवारी इंडिया आघाडीच्या  महिला खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठोस आवाज उठवला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा, खासदार प्रतिभा धानोरकर  आणि खासदार वर्षा गायकवाड सह अनेक काँग्रेस महिला खासदारांनी  नारीशक्तीने रस्त्यावर उतरून मतदारांचे हक्क रक्षण्याची हाक दिली आहे.
खासदार प्रियंका वाड्रा  यांच्या नेतृत्वात संसदेच्या रस्त्यावर उतरून निर्वाचन आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले .
खासदार प्रतिभा धानोरकर , आमच्या जिल्ह्यातही दहा ते पंधरा हजार मतदान वाढलेले आहेत. याबाबत आम्ही पिटीशन दाखल करून सुद्धा आम्हाला उत्तर मिळाले नाही. बोगस मतदान झालेल्या प्रकरणात निर्वाचन आयोगाने जनतेपुढे उत्तर द्यावे.

या निषेधाच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी ऐतिहासिक विधान केले:  
One man one vote.
**"वोट कि चोरी नहीं चलेगी!** (मतांची चोरी आता चालणार नाही!) *महाराष्ट्राच्या विधानसभा झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. *महाराष्ट्रामध्ये 40 लाख बोगस वोटर घुसवण्यात आले होते. *मतदार यादी मध्ये बनावट वोटर ची नावे आहेत. गेल्या पाच महिन्यात एक कोटी बोगस मतदान दाखवून भाजप आणि निर्वाचन आयोग यांनी मिळून मते चोरली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच प्रकारे काँग्रेसचे उमेदवार पडले. याच पद्धतीने समोर येणार्या निवडणूका सुद्धा भाजपा जिंकली? असा खळबळ जनक आरोप खासदार राहुल गांधी पत्रकार परिषदेत  केला आहे. लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असा विश्वास जनतेला त्यांनी दिला आहे. 

 काँग्रेस खासदार व इतर आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे रस्त्यावर झालेल्या प्रदर्शनाने सत्ताधाऱ्यांना स्पष्ट सूचित केले आहे: वोट की चोरी नही चलेगी l "सावित्रीच्या लेकी" आता लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या  आहे.

************


****


Comments